शहरात कोरोटांईग करण्यात आलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत : राज्यमंत्री सजय बनसोडे

शहरात कोरोटांईग करण्यात आलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत : राज्यमंत्री सजय बनसोडे
उदगीर: उदगीर शहरात बाहेर जिल्ह्यातील तसेच बाहेर राज्यामधून आलेल्या नागरिकांना कोरोडांईग करण्यात येत आहे.या नागरिकांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदगीर येथे आज आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला लातुरचे अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, पोलीस उप अधिक्षक श्री जवळकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे नगरपालिका मुख्यधिकारी श्री राठोड उपस्थित होते.
उदगीर शहरात मागील आठवड्यात कोरोना पाँझीटीव्ह रूग्ण आढळले आहेत या पार्श्वभूमीवर शहरात काही कंटोमेट झोन तयार केले आहेत तेथे आवश्यक त्या सुविधा घरपोच देण्यात येत आहेत. या झोनमध्ये दूध, पाणी, मिडीकल सुविधा पुरविण्यात येत आहेत. या भागातील सतरा हजार नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे या भागावर व उदगीर शहरावर ड़ोन कँमेरा व सी.सी.टीव्ही  यांने लक्ष ठेवण्यात येत आहे. शहरात सर्वत्र फवारणी करण्यात आली आहे.कोरोना संदर्भात उपाययोजना बाबत निधीची कमतरता पडु देणार नाही
पुढील आठवड्यात पर जिल्ह्यातील नागरिक आपल्या जिल्ह्यात व तालुक्यात येतील तेव्हा प्रत्येकाची तपासणी व प्रत्येकाला कोरोडांईग करण्यात यावे विनापरवाना येणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल करावा.येणाऱ्या काळात शहरात सुद्धा अँन्टी कोरोना फोर्स तयार करावी. स्वस्त धान्य दुकानातून या महिन्यातील धान्य दोन दिवसात उपलब्ध करून देण्यात यावे.या सोबत पुढील काळात शहरात पाणी टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा सुचना राज्याचे पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम(उपक्रम)राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बैठकी दरम्यान केल्या.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image