कारवा फाउंडेशनचा तृतीय पंथीयांना मदतीचा हात संचारबंदीमुळे होत होती उपासमार: महसूल प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद उदगीर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केल्यामुळे शहरातील तृतीयपंथी नागरिकांची होत असलेली उपासमार दूर करण्यासाठी कारवा फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला असून तीन आठवडे पुरेल इतके धान्य त्यांना देण्यात आले आहे. शहरातील 15/20 तृतीयपंथीयांची कोरोनामुळे त्यांचेकडे पुरेसे अन्नधान्य व्यवस्था नसून उपासमार होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे काही तृतीयपंथी व काही नागरिक यांनी प्रशासनास कळवून काही व्यवस्था करण्याची विनंती केली होती. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी याची तात्काळ दखल घेऊन त्यांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संघटनाना आवाहन केले होते. त्यास उदगीर शहरातील कारवा फौंडेशन यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत महसूल प्रशासन उदगीर व कारवा फौंडेशन उदगीर यांनी किमान तीन आठवडे पुरेल एवढे गहु आटा, तांदूळ, तेल ,तिखट, मीठ इत्यादी अन्नधान्य उदगीर येथील नालंदा नगर येथे घरी जाउन तृतीयपंथी यांना देण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, कारवा फाउंडेशन च्या अध्यक्षा आदिती पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही