कारवा फाउंडेशनचा तृतीय पंथीयांना मदतीचा हात संचारबंदीमुळे होत होती उपासमार: महसूल प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद उदगीर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केल्यामुळे शहरातील तृतीयपंथी नागरिकांची होत असलेली उपासमार दूर करण्यासाठी कारवा फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला असून तीन आठवडे पुरेल इतके धान्य त्यांना देण्यात आले आहे. शहरातील 15/20 तृतीयपंथीयांची कोरोनामुळे त्यांचेकडे पुरेसे अन्नधान्य व्यवस्था नसून उपासमार होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे काही तृतीयपंथी व काही नागरिक यांनी प्रशासनास कळवून काही व्यवस्था करण्याची विनंती केली होती. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी याची तात्काळ दखल घेऊन त्यांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संघटनाना आवाहन केले होते. त्यास उदगीर शहरातील कारवा फौंडेशन यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत महसूल प्रशासन उदगीर व कारवा फौंडेशन उदगीर यांनी किमान तीन आठवडे पुरेल एवढे गहु आटा, तांदूळ, तेल ,तिखट, मीठ इत्यादी अन्नधान्य उदगीर येथील नालंदा नगर येथे घरी जाउन तृतीयपंथी यांना देण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, कारवा फाउंडेशन च्या अध्यक्षा आदिती पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
Popular posts
*मजविपच्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न*
• विक्रम हलकीकर

*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
• विक्रम हलकीकर
महमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ५१ जनांचे रक्तदान. मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस चा उपक्रम.
• विक्रम हलकीकर
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
• विक्रम हलकीकर
मराठवाडा जनता विकास परिषद उदगीर तर्फे मुख्यमंत्री निधी 55555 रुपयाची मदत
• विक्रम हलकीकर
Publisher Information
Contact
nilsamachar@gmail.com
9403012041
Brahman galli udgir
About
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn