कारवा फाउंडेशनचा तृतीय पंथीयांना मदतीचा हात संचारबंदीमुळे होत होती उपासमार: महसूल प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद उदगीर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केल्यामुळे शहरातील तृतीयपंथी नागरिकांची होत असलेली उपासमार दूर करण्यासाठी कारवा फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला असून तीन आठवडे पुरेल इतके धान्य त्यांना देण्यात आले आहे. शहरातील 15/20 तृतीयपंथीयांची कोरोनामुळे त्यांचेकडे पुरेसे अन्नधान्य व्यवस्था नसून उपासमार होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे काही तृतीयपंथी व काही नागरिक यांनी प्रशासनास कळवून काही व्यवस्था करण्याची विनंती केली होती. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी याची तात्काळ दखल घेऊन त्यांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संघटनाना आवाहन केले होते. त्यास उदगीर शहरातील कारवा फौंडेशन यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत महसूल प्रशासन उदगीर व कारवा फौंडेशन उदगीर यांनी किमान तीन आठवडे पुरेल एवढे गहु आटा, तांदूळ, तेल ,तिखट, मीठ इत्यादी अन्नधान्य उदगीर येथील नालंदा नगर येथे घरी जाउन तृतीयपंथी यांना देण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, कारवा फाउंडेशन च्या अध्यक्षा आदिती पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज