गरिबांच्या फ्रिजला कोरोनाची बाधा...!: उदगीर

गरिबांच्या फ्रिजला कोरोनाची बाधा...!
उदगीर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा परिणाम गरीबाचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठाच्या विक्रीवरही झाला असून यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची उपासमार होत आहे.
उन्हाळा आला की सामान्य माणूस थंड पाणी पिण्यासाठी मातीपासून बनविलेल्या माठाची खरेदी करण्यासाठी गर्दी करतात, पण सध्या सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे या गरीबाच्या फ्रिजलाही कोरोनाची बाधा झाली असून या माठाची विक्रीच थांबली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने संचारबंदी लागु केली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूची दुकाणे वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा आदेश सरकारने काढला. शिवाय जनतेला रस्त्यावर येण्यासाठी निर्बन्ध लावण्यात आले आहेत. 
मातीच्या माठाची विक्री ही रस्त्यावरच केली जाते. गेल्या पंधरा दिवसापासून रस्त्यावर येण्यास बंदी असल्याने ग्राहकच येत नाहीत या माठाची विक्री करणारे व्यापाऱ्यांची अडचण झाली आहे.
उदगीर शहरात सध्या दरवर्षी पोलीस स्टेशनच्या समोर हे व्यापारी बसून असतात पण सध्याच्या परिस्थितीमुळे हे व्यापारीही घरातच बसून असल्याने याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.
मातीच्या माठाचा व्यापार करणारे गोरख रुईकर यांनी सांगितले की, मेहनत करून माठ बनवून विक्रीला आणले होते, परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे माठाची विक्री चक्क थांबली आहे. आपले सहा सात माणसाचे कुटुंब असून पुढचा काळ कसा घालवायचा याची चिंता लागल्याचे सांगितले.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज