विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन

 विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका

  -  डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन 

 


   

    लातूर/प्रतिनिधी:

निवडणुकीच्या काळात अपप्रचार करून मतदारांना भ्रमित करण्याचे काम केले जाते. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी अशा प्रचाराला बळी पडू नये,असे आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले.

      गोजमगुंडे लॉन्स येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडळाच्या वतीने आयोजित मेळाव्यात डॉ.

अर्चनाताई पाटील बोलत होत्या.या मेळाव्यास शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,मंडल अध्यक्ष प्रमोद गुडे यांच्यासह माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी,शैलेश गोजमगुंडे, सरचिटणीस दिग्विजय काथवटे,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲड.व्यंकट बेद्रे,प्रदेश सचिव मुर्तुजा खान, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (जोगेंद्र कवाडे) गटाचे आर.टी.कांबळे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष मोहसीन खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी बोलताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, निवडणुकीच्या काळात विकास कामांवर न बोलता मतदारांची दिशाभूल करण्याचे काम केले जाते.या निवडणुकीतही विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अपप्रचार सुरू आहे. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या काळात सतर्क रहावे. कुठल्याही प्रकारची गडबड होऊ शकते,याची जाणीव ठेवा.अफवांना बळी पडू नका. प्रचारादरम्यान आपण विकास कामांवर बोलतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना नागरिकांना समजावून सांगा.लाडकी बहीण, प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या योजनांची माहिती नागरिकांना द्या,असे आवाहनही त्यांनी केले.

     दि.२० नोव्हेंबर रोजी कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून महायुतीचे सरकार आणण्यासाठी मदत करा,असे आवाहनही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केले.

   यावेळी बोलताना ॲड. बेद्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करत असल्याची ग्वाही दिली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी डॉ.

अर्चनाताईंच्या पाठीशी उभा असल्याचे ते म्हणाले.प्रशांत पाटील यांनी शहराच्या पूर्व भागातील प्रश्नांसंदर्भात स्थानिक नेतृत्वाने काय केले ? असा अहवाल उपस्थित केला.निष्क्रिय नेतृत्वाला घरी बसवण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत,असे आवाहनही त्यांनी केले.

     सचिन दाने यांनी विधानसभेवर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

    भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी आता मतदानासाठी अल्प काळ शिल्लक असून अर्चनाताईंच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देण्याचे आवाहन केले.मंडल अध्यक्ष प्रमोद गुडे यांनी शहराच्या पूर्व भागातून मताधिक्य मिळवून देण्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.या 

मंडळात ६५ बुथ आणि २४ शक्ती केंद्र आहेत.या सर्व बुथवर ताईंना मताधिक्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

    या मेळाव्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडळातील सर्व बुथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*