कोरोना कम्युनिटी क्लिनिक व कोरोना मोबाईल व्हॅनचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

कोरोना कम्युनिटी क्लिनिक व कोरोना मोबाईल व्हॅनचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
उदगीर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता याचा संसर्ग जास्त होऊ नये यासाठी उदगीर मध्ये कोरोना कम्युनिटी क्लिनिकची निर्मिती करण्यात आली आहे. याचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उदगीर शहरातील विविध भागात नऊ ठिकाणी कोरोना कम्युनिटी क्लिनिक उभे करण्यात येणार आहेत. यात करोना सदृश लक्षणे असणाऱ्या म्हणजे, सर्दी, ताप,खोकला, श्वास घ्यायला त्रास असणे यावर उपचार करण्यात येणार आहेत. 
या क्लिनिक मध्ये सरकारी डॉक्टर तसेच खाजगी डॉक्टर सेवा देणार आहेत. महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिलेच क्लिनिक असावे यामुळे शहरात या रोगाचा प्रसार होण्यास आळा बसेल त्या परिसरातील नागरिक तेथे उपचार घेतील या दवाखान्यात काम करणाऱ्या खाजगी डॉक्टर यांना यावेळी मा.मंत्रीमहोदयाच्या हस्ते पी. पी. ई. किट चे (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट ) वाटप करण्यात आले.
यासोबत करोना मोबाईल व्हँन याचेही उद्घाटन करण्यात आले आहे ही व्हँन शहरातील विविध भागात फिरून ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला आहे त्यांना तेथेच उपचार करेल या सोबतच करोना संदर्भात नागरिकाचे चाचणी साठीचे नुमणे तपासणी साठी याच व्हँनचा उपयोग केला जाणार आहे. यामुळे कोरोना रुग्णाकडुन इतर नागरिकांना संक्रमण होण्याची शक्यता कमी होईल असे मत राज्याचे राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, वैद्यकीय उपसंचालक डॉ. एकनाथ माले,उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी ,तहसीलदार व्यंकटेश मुंडे, डॉ. पवार, डॉ. देशपांडे तसेच निमा संघटनेचे, मेडिकल असोसिएशन चे अनेक डॉक्टर उपस्थित होते.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image