मुख्यमंत्री रिलीफ फंडाला ग्रीन आर्मीच्या वतीने दहा हजार रुपयांचा निधी जिव्हाळा ग्रुपकडूनही पाच हजाराचा निधी

मुख्यमंत्री रिलीफ फंडाला ग्रीन आर्मीच्या वतीने दहा हजार रुपयांचा निधी
जिव्हाळा ग्रुपकडूनही पाच हजाराचा निधी
उदगीर : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उदगीर येथील ग्रीन आर्मी या संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री रिलीफ फंडाला दहा हजार रुपये तर जिव्हाळा ग्रुपच्या वतीने पाच हजार रुपयाचा निधी देण्यात आला.
गेल्या पंधरा दिवसापासून देशात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. संसर्गामुळे होणाऱ्या या आजाराचे रुग्ण दैनंदिन वाढत असल्याचे चित्र आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील दानशूर व्यक्ती, सामाजिक, स्वयंसेवी संस्था यांना मुख्यमंत्री रिलीफ फंडाला निधी देण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून अनेकांनी निधी दिला आहे. उदगीर येथेही पर्यावरण संवर्धन व वृक्ष लागवड व संगोपनासाठी कार्य करणाऱ्या ग्रीन आर्मी व विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या जिव्हाळा ग्रुप या दोन सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री रिलीफ फंडाला निधी देण्याचे ठरविले. त्यानुसार ग्रीन आर्मीच्या वतीने दहा हजार रुपयांचा तर जिव्हाळा ग्रुपच्या वतीने पाच हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री रिलीफ फंडात ऑनलाइन जमा करण्यात आला. 
दरम्यान लॉकडाऊनमुळे उदगीर शहरात अडकून पडलेल्या आंध्रप्रदेशातील विद्यार्थ्यांना दोन दिवस जेवणाची सोयही ग्रीन आर्मी व जिव्हाळा ग्रुपने केली.


टिप्पण्या
Popular posts
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा