माजी आ. भालेराव गोरगरिबांच्या मदतीसाठी गावोगावी पोहोचले वडिलांच्या कार्यात मुलांचाही सहभाग : नागरिकाना अन्नधान्याचे कीट घरपोच

माजी आ. भालेराव गोरगरिबांच्या मदतीसाठी गावोगावी पोहोचले
वडिलांच्या कार्यात मुलांचाही सहभाग : नागरिकाना अन्नधान्याचे कीट घरपोच
उदगीर : राजकारणात राहूनही समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणारे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी कोरोनाच्या संकटात मतदारसंघातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी गावोगावी पोहोचले असून खऱ्या गरजू गरीब जनतेला अन्नधान्याचे किट घरपोच देण्यात येत आहेत.
माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघाचे दोन टर्म प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघात त्यांची गावोगावी जनतेशी नाळ जुळलेली आहे. गावोगावी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ही जनतेशी जुळलेली नाळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. नेहमीच ते सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी असतात. 
सध्या कोरोनाच्या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. दोन वेळच्या लॉकडाऊन मूळे गोरगरीब जनतेची उपासमार होत आहे. आणखी तिसऱ्यांदा लोकडाऊन वाढविला आहे. त्यामुळे या गोरगरीबाची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. या परिस्थितीत त्यांना माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात द्यावा ही भावना बाळगून माजी आ. सुधाकर भालेराव यांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन या जनतेला अन्न धान्याचे किट देण्याचे नियोजन केले. जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गरजू लोकांची यादी तयार करून त्यांच्यापर्यंत अन्नधान्याचे किट घरपोच देण्याची योजना आखून ती राबविली. जवळपास एक हजारांच्यावर अन्नधान्याचे किट तयार करून ते गरजू पर्यंत पोहोचविली जात आहेत. माजी आ. भालेराव यांच्या या समाजकार्यात त्यांचे पुत्र अमोल भालेराव, मुलगी ऐश्वर्या भालेराव हे देखील हिरीरीने सहभागी होऊन गरजू लोकांना मदतीसाठी पुढे आले आहेत.
आज सोमवारी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, माजी आ. सुधाकर भालेराव, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात यांच्या उपस्थितीत हे अन्नधान्याचे किट असलेले टेम्पो जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागाकडे रवाना करण्यात आले. माजी आ. सुधाकर भालेराव यांचे सुपुत्र अमोल भालेराव, मुलगी ऐश्वर्या भालेराव हे स्वतः गावोगावी जाऊन गरजू लोकांना अन्नधान्याचे किट घरपोच देत आहेत.
यावेळी बोलताना माजी आ. भालेराव यांनी या कोरोनाच्या संकटात सामान्य जनतेच्या मदतीला माणुसकीच्या भावनेतून धावून जाणे गरजेचे आहे. या काळात प्रशासन जनतेच्या आरोग्यासाठी झटत असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. कोरोनामुळे मोठया प्रमाणात गरीब जनतेला संकटाला सामोरे जावे लागत असून अशा काळात समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटनानी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहनही यावेळी भालेराव यांनी केले आहे.


 


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image