*जिल्हयात बाहेरुन आलेल्या लोकांच्या तपासणीसाठी घशातिल द्रव नमूने घेण्यासाठी प्रत्येक आरोग्यकेंद्रात सुविधा ऊपलब्ध करुण दयावी व तपासणी ची गती वाढवा* *जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्र्यांकडे व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

*जिल्हयात बाहेरुन आलेल्या लोकांच्या तपासणीसाठी घशातिल द्रव नमूने घेण्यासाठी प्रत्येक आरोग्यकेंद्रात सुविधा ऊपलब्ध करुण दयावी व तपासणी ची गती वाढवा*


*जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्र्यांकडे व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी
लातूर : संपूर्ण देशभरात 25 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आता आपल्या जिल्ह्यामध्ये परत येण्यासाठी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत अर्ज करून परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे लातूर जिल्ह्यात जेवढे नागरिक येतील त्या सर्वांचेच नमुने घेणे आवश्यक वाटते याकरिता सर्व नमुने घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यात सध्या फक्त अहमदपूर , उदगीर , निलंगा, लातूर या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत तर या सुविधा वाढवून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी सर्व नमुने घेण्याची यंत्रसामग्री व प्रयोगशाळा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्री अमित देशमुख व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना यापूर्वी 14 दिवस क्वारंटाईन केले जायचे परंतु सध्या फक्त पाच दिवस शाळेत व उर्वरित नऊ दिवस घरी क्वारंटाईन करण्याबाबत पत्र मिळाल्याचे कळते. हे अतिशय धोकादायक आहे त्यांना 14 दिवस विशिष्ट ठिकाणी क्वारंटाईन करण्यात यावे. 
बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना दोन हजार रुपये दंड आकारला जात आहे परंतु काही लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे ते हा दंड भरू शकत नाहीत तरी या दंडाच्या रकमेबाबत पुनर्विचार करावा अशीही मागणी केंद्रे यांनी केली आहे.
काही तालुक्यांमध्ये तालुका दंडाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामध्ये समन्वय दिसून येत नाही त्यामुळे काही तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे, सध्या आरोग्य विभागावर खूप मोठा कामाचा ताण असल्यामुळे त्यांना समजून घेऊन धीर देणे महत्त्वाचे वाटते जेणेकरून ते आणखी जोमाने काम करतील असे म्हणत राहुल केंद्रे यांनीलातूर जिल्ह्याची हद्दबंदी आणखीन मजबूत करणे आवश्यक वाटते, जेणेकरून बाहेरील व्यक्ती आपल्या जिल्ह्यात विनापरवानगी प्रवेश करणार नाहीत. जिल्ह्याबाहेरील परवानगी घेऊन लातूर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व लोकांच्या swab चे नमुने घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात यावे. असेही पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ऊदगीर शहरात बरेच कोरोना संशयित रुग्ण असू शकतात. या करिता कोराना महामारीपासुन जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर तपासण्या होण्याची आवश्यकता आहे.यासाठी मोठया प्रमाणावर मनूष्यबळ व तपासणी केंद्राच्या सोईसुविधा उपलब्ध करुन दयावेत अशी मागणीही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली आहे.


टिप्पण्या
Popular posts
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*