*जिल्हयात बाहेरुन आलेल्या लोकांच्या तपासणीसाठी घशातिल द्रव नमूने घेण्यासाठी प्रत्येक आरोग्यकेंद्रात सुविधा ऊपलब्ध करुण दयावी व तपासणी ची गती वाढवा* *जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्र्यांकडे व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

*जिल्हयात बाहेरुन आलेल्या लोकांच्या तपासणीसाठी घशातिल द्रव नमूने घेण्यासाठी प्रत्येक आरोग्यकेंद्रात सुविधा ऊपलब्ध करुण दयावी व तपासणी ची गती वाढवा*


*जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्र्यांकडे व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी
लातूर : संपूर्ण देशभरात 25 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आता आपल्या जिल्ह्यामध्ये परत येण्यासाठी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत अर्ज करून परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे लातूर जिल्ह्यात जेवढे नागरिक येतील त्या सर्वांचेच नमुने घेणे आवश्यक वाटते याकरिता सर्व नमुने घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यात सध्या फक्त अहमदपूर , उदगीर , निलंगा, लातूर या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत तर या सुविधा वाढवून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी सर्व नमुने घेण्याची यंत्रसामग्री व प्रयोगशाळा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्री अमित देशमुख व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना यापूर्वी 14 दिवस क्वारंटाईन केले जायचे परंतु सध्या फक्त पाच दिवस शाळेत व उर्वरित नऊ दिवस घरी क्वारंटाईन करण्याबाबत पत्र मिळाल्याचे कळते. हे अतिशय धोकादायक आहे त्यांना 14 दिवस विशिष्ट ठिकाणी क्वारंटाईन करण्यात यावे. 
बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना दोन हजार रुपये दंड आकारला जात आहे परंतु काही लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे ते हा दंड भरू शकत नाहीत तरी या दंडाच्या रकमेबाबत पुनर्विचार करावा अशीही मागणी केंद्रे यांनी केली आहे.
काही तालुक्यांमध्ये तालुका दंडाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामध्ये समन्वय दिसून येत नाही त्यामुळे काही तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे, सध्या आरोग्य विभागावर खूप मोठा कामाचा ताण असल्यामुळे त्यांना समजून घेऊन धीर देणे महत्त्वाचे वाटते जेणेकरून ते आणखी जोमाने काम करतील असे म्हणत राहुल केंद्रे यांनीलातूर जिल्ह्याची हद्दबंदी आणखीन मजबूत करणे आवश्यक वाटते, जेणेकरून बाहेरील व्यक्ती आपल्या जिल्ह्यात विनापरवानगी प्रवेश करणार नाहीत. जिल्ह्याबाहेरील परवानगी घेऊन लातूर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व लोकांच्या swab चे नमुने घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात यावे. असेही पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ऊदगीर शहरात बरेच कोरोना संशयित रुग्ण असू शकतात. या करिता कोराना महामारीपासुन जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर तपासण्या होण्याची आवश्यकता आहे.यासाठी मोठया प्रमाणावर मनूष्यबळ व तपासणी केंद्राच्या सोईसुविधा उपलब्ध करुन दयावेत अशी मागणीही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली आहे.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही