सुधाकर भालेराव यांनी खासदार होऊन जिल्हा सांभाळावा राज्यमंत्री संजय बनसोडे

सुधाकर भालेराव यांनी खासदार होऊन जिल्हा सांभाळावा


राज्यमंत्री संजय बनसोडे


उदगीर : माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाची जिल्ह्याला गरज असून त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचा विचार करू नये, आगामी काळात त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून खासदार होऊन जिल्हा सांभाळावा असे मत राज्याचे पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.


उदगीर येथील लाईफकेअर हॉस्पिटल माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या कंपनीमार्फत नव्याने सुरू करण्यात आले असून राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत साई मूर्तीची पूजा करून आज हे हॉस्पिटल आज सुरू करण्यात आले. 


यावेळी बोलताना माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आपण गेल्या दहा वर्षांत उदगीरचे लोकप्रतिनिधी म्हणून समाधानकारक केले असून आगामी काळात लाईफ केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा करायची आहे. आता आपण राजकारणातुन संन्यास घेणार असल्याचे सांगितले.


भालेराव यांच्या भाषणाचा धागा पकडून बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, सुधाकर भालेराव यांनी दहा वर्षे उदगीर मतदार संघाचे दमदार नेतृत्व केले आहे. त्यांच्या नेतृत्वाची जिल्ह्याला गरज आहे. पुढील काळात मी उदगीरचे तर भालेराव यांनी जिल्ह्याचे खासदार बनून नेतृत्व करावे, भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळेलच अन्यथा आघाडीकडून उमेदवारी देण्याचा विचार करू असे सांगण्यासही राज्यमंत्री विसरले नाहीत.


राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केलेल्या या विधानामुळे आगामी काळात राजकीय समीकरणं बरीच बदलणार असल्याचे दिसते.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image