उदगीरच्या बसस्थानकातून तब्बल ५१ दिवसांनी बस बाहेर: विद्यार्थी व मजुरांना घेऊन नागपूरकडे रवाना

उदगीरच्या बसस्थानकातून तब्बल ५१ दिवसांनी बस बाहेर: विद्यार्थी व मजुरांना घेऊन नागपूरकडे रवाना
उदगीर: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे वाहतुकीची कुठलीच सोय नसल्याने उदगीरात अडकून पडलेल्या काही विद्यार्थी व मजुरांना घेऊन परिवहन मंडळाची बस नागपूरकडे आज रवाना करण्यात आली. तब्बल ५१ दिवसानंतर आज बस रस्त्यावरून धावत आहे.
कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी 24 मार्च रोजी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे देशातील सर्व वाहतूक यंत्रणा ही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. याचा फटका शहरात बाहेरून आलेल्या मजूर व विद्यार्थी वर्गांना बसला. गेली दोन महिन्यांपासून आपल्या गावाकडे जाण्यासाठी हे मजूर व विद्यार्थी प्रयत्न करीत होते. मात्र कुठलीच सोय नसल्याने यांना उदगीर शहरातच अडकून राहावे लागले. यात विद्यार्थी स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील असल्याने त्याच कँपस मध्ये त्यांची राहण्याची व जेवण्याची सोय करण्यात आली. तर मजुराना पालिकेने बांधलेल्या रात्र निवारा केंद्राचा आधार मिळाला.
परवा राज्य शासनाने अशा बाहेरगावी अडकलेल्या मजूर व विद्यार्थ्यांना आपल्या गावाकडे परत जाण्यासाठी बसची सोय करण्यात येणार असल्याचे आदेश काढले. यानंतर सदरील विद्यार्थी व मजुरांनी बसस्थानक प्रमुखांशी संपर्क साधला. सामाजिक अंतराचा नियम बाळगत एका आसनावर एक प्रवाशी असे एकूण 24 प्रवाशी संख्या पूर्ण झाल्यानंतर ही बस नागपूर कडे रवाना करण्यात आली. यात 13 विद्यार्थी व 11 मजुरांचा समावेश आहे.
अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, आगार प्रमुख यशवंत काणतोडे यांच्या उपस्थितीत ही बस नागपूर कडे रवाना झाली.
दरम्यान उदगीरच्या बसस्थानकात अशा प्रवाशांसाठी नोंदणी कक्षाची निर्मिती करण्यात आली असून एका बसची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांशी संपर्क साधून बस संबंधित गावाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुरेश कज्जेवाड यांनी दिली.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज