उदगीरच्या बसस्थानकातून तब्बल ५१ दिवसांनी बस बाहेर: विद्यार्थी व मजुरांना घेऊन नागपूरकडे रवाना

उदगीरच्या बसस्थानकातून तब्बल ५१ दिवसांनी बस बाहेर: विद्यार्थी व मजुरांना घेऊन नागपूरकडे रवाना
उदगीर: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे वाहतुकीची कुठलीच सोय नसल्याने उदगीरात अडकून पडलेल्या काही विद्यार्थी व मजुरांना घेऊन परिवहन मंडळाची बस नागपूरकडे आज रवाना करण्यात आली. तब्बल ५१ दिवसानंतर आज बस रस्त्यावरून धावत आहे.
कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी 24 मार्च रोजी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे देशातील सर्व वाहतूक यंत्रणा ही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. याचा फटका शहरात बाहेरून आलेल्या मजूर व विद्यार्थी वर्गांना बसला. गेली दोन महिन्यांपासून आपल्या गावाकडे जाण्यासाठी हे मजूर व विद्यार्थी प्रयत्न करीत होते. मात्र कुठलीच सोय नसल्याने यांना उदगीर शहरातच अडकून राहावे लागले. यात विद्यार्थी स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील असल्याने त्याच कँपस मध्ये त्यांची राहण्याची व जेवण्याची सोय करण्यात आली. तर मजुराना पालिकेने बांधलेल्या रात्र निवारा केंद्राचा आधार मिळाला.
परवा राज्य शासनाने अशा बाहेरगावी अडकलेल्या मजूर व विद्यार्थ्यांना आपल्या गावाकडे परत जाण्यासाठी बसची सोय करण्यात येणार असल्याचे आदेश काढले. यानंतर सदरील विद्यार्थी व मजुरांनी बसस्थानक प्रमुखांशी संपर्क साधला. सामाजिक अंतराचा नियम बाळगत एका आसनावर एक प्रवाशी असे एकूण 24 प्रवाशी संख्या पूर्ण झाल्यानंतर ही बस नागपूर कडे रवाना करण्यात आली. यात 13 विद्यार्थी व 11 मजुरांचा समावेश आहे.
अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, आगार प्रमुख यशवंत काणतोडे यांच्या उपस्थितीत ही बस नागपूर कडे रवाना झाली.
दरम्यान उदगीरच्या बसस्थानकात अशा प्रवाशांसाठी नोंदणी कक्षाची निर्मिती करण्यात आली असून एका बसची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांशी संपर्क साधून बस संबंधित गावाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुरेश कज्जेवाड यांनी दिली.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज