उदगीरच्या बसस्थानकातून तब्बल ५१ दिवसांनी बस बाहेर: विद्यार्थी व मजुरांना घेऊन नागपूरकडे रवाना

उदगीरच्या बसस्थानकातून तब्बल ५१ दिवसांनी बस बाहेर: विद्यार्थी व मजुरांना घेऊन नागपूरकडे रवाना
उदगीर: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे वाहतुकीची कुठलीच सोय नसल्याने उदगीरात अडकून पडलेल्या काही विद्यार्थी व मजुरांना घेऊन परिवहन मंडळाची बस नागपूरकडे आज रवाना करण्यात आली. तब्बल ५१ दिवसानंतर आज बस रस्त्यावरून धावत आहे.
कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी 24 मार्च रोजी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे देशातील सर्व वाहतूक यंत्रणा ही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. याचा फटका शहरात बाहेरून आलेल्या मजूर व विद्यार्थी वर्गांना बसला. गेली दोन महिन्यांपासून आपल्या गावाकडे जाण्यासाठी हे मजूर व विद्यार्थी प्रयत्न करीत होते. मात्र कुठलीच सोय नसल्याने यांना उदगीर शहरातच अडकून राहावे लागले. यात विद्यार्थी स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील असल्याने त्याच कँपस मध्ये त्यांची राहण्याची व जेवण्याची सोय करण्यात आली. तर मजुराना पालिकेने बांधलेल्या रात्र निवारा केंद्राचा आधार मिळाला.
परवा राज्य शासनाने अशा बाहेरगावी अडकलेल्या मजूर व विद्यार्थ्यांना आपल्या गावाकडे परत जाण्यासाठी बसची सोय करण्यात येणार असल्याचे आदेश काढले. यानंतर सदरील विद्यार्थी व मजुरांनी बसस्थानक प्रमुखांशी संपर्क साधला. सामाजिक अंतराचा नियम बाळगत एका आसनावर एक प्रवाशी असे एकूण 24 प्रवाशी संख्या पूर्ण झाल्यानंतर ही बस नागपूर कडे रवाना करण्यात आली. यात 13 विद्यार्थी व 11 मजुरांचा समावेश आहे.
अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, आगार प्रमुख यशवंत काणतोडे यांच्या उपस्थितीत ही बस नागपूर कडे रवाना झाली.
दरम्यान उदगीरच्या बसस्थानकात अशा प्रवाशांसाठी नोंदणी कक्षाची निर्मिती करण्यात आली असून एका बसची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांशी संपर्क साधून बस संबंधित गावाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुरेश कज्जेवाड यांनी दिली.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image