*जिल्ह्यातील 69 व्यक्तींच्या स्वाबपैकी 58 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह, 3 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह तर 7 अनिर्णीत* *पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती ममदापुर येथील असून एक व्यक्ती निवासी डॉक्टर* 

*जिल्ह्यातील 69 व्यक्तींच्या स्वाबपैकी 58 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह, 3 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह तर 7 अनिर्णीत*


*पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती ममदापुर येथील असून एक व्यक्ती निवासी डॉक्टर* 


*आज एकूण 16 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी*


*जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 62, रुग्णालयातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 174 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13*


लातूर :- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत लातूर जिल्ह्यातील एकूण 69 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 58 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत , 03 नवीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीची 14 दिवसानंतर पुनर्तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच 07 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती ममदापुर येथील असून एक व्यक्ती निवासी डॉक्टर असून ते दिनांक 10 जून 2020 रोजी मुंबई येथून प्रवास करून आले असून मागील सात दिवसापासून ते कर्त्याव्यवर उपस्थित नव्हते.(त्यांचा Duty Off होता ) तीन दिवसापासून सर्दी व ताप आल्यामुळे सौम्य स्वरूपाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची आज तपासणी केली असता त्यांचा आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज जिल्ह्यात नवीन 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.


*आज एकूण 16 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी*


आज लातूर जिल्ह्यासाठी मोठा दिलासादायक दिवस असून जिल्ह्यातून 16 कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून हनुमान नगर चे 6 रुग्ण, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बाभळगाव 2, हिप्परगा 1, भाग्यनगर 1 व भुसार लाईन चा 1 असे एकूण 5 रुग्ण, आतिरिक्‍त एमआयडीसी मध्ये 1000 मुला मुलींच्या वसतिगृहात निर्माण केलेल्या कोविड केअर सेंटर मधून क्रांतीनगर चे 2 व चौधरी नगर चा 1 असे 3 रुग्ण व दापका तालुका निलंगा येथील कोविड केअर सेंटरमधून 2 रुग्ण असे एकूण आज 16 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.


सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 62, रुग्णालयातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 174 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13 अशी आहे.


 


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image