श्यामची आई" ही काळाच्या पलीकडे प्रभावी: धनंजय गुडसूरकर 

"श्यामची आई" ही काळाच्या पलीकडे प्रभावी: धनंजय गुडसूरकर


उदगीर : श्यामची आई ने केलेली मुल्यांची पेरणी कालातीत आहे,हे संस्काराचे मोती नव्या पिढीसाठी प्रेरक असून श्यामची आई ची कृतीयुक्तता ही हे संस्कारपीठच आहे" असे प्रतिपादन साने गुरूजींच्या साहित्याचे अभ्यासक धनंजय गुडसूरकर यांनी आॕनलाईन संवादात केले.


साने गुरुजींच्या स्मृतीदिनानिमित्त "आई श्यामची व मम्मी आजची" या विषयावर गुडसूरकर यांच्या आॕनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते."दीडशे वर्षाआधी जन्मलेल्या आणि शतकापूर्वी हे जग सोडून गेलेल्या य आईच्या विचाराची आज उपयुक्तता काय?"असा प्रश्न आज उपस्थित होणे स्वाभाविक आहे."मात्र या माऊलीने वर्तनातून केलेले संस्कार आणि विचारांची पेरणी ही काळाच्या कसोटीवर टिकणारी आहे.सभोवतालची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना त्या परिस्थितीला शरण न जाता आपल्या विचारांशी व तत्वांशी कायम राहून तिने केलेला संघर्ष श्यामला घडवून गेला.एका बुज-या मुलाचे रुपांतर सेनानी मध्ये झाले.सामाजिक भूमिका घेताना कणखरपणे जगणाऱ्या साने गुरुजींची जडणघडण आईच्या कणखरपणात झाली होती"याकडे गुडसूरकर यांनी लक्ष वेधले.


आज संसाधने व माध्यमांमुळे सामाजिक विचार सहज पोचतो आहे.मात्र त्या काळात विवेकी विचारांची पेरणी करणारी सामान्य कुटुंबातील ही स्री विवेकाचं विद्यापीठ ठरते. विचारांवर चालणाऱ्या व कृतीतून त्याची अंमलबजावणी करणाऱ्या या मातेबद्दलचा आदर अधिक वाढतो असे गुडसूरकर पुढे बोलताना म्हणाले.शिकलेले लोक बिघडतात म्हणून शिक पण चांगला हो हा सल्ला ती आपल्या मुलांना त्याकाळात देते,दुर्दैवाने तिची भिती आज खरी ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.मोह सोडणे म्हणजे धर्म अशी धर्माची सहजसोपी व्याख्या करणारी यशोदामाता चिंतनाच्या पातळीवर श्रेष्ठ ठरते असे सांगून आपला पाल्य श्याम होणार नसला तरी किमान संवेदनशील माणूस व्हावा यासाठी स्वयंव्यग्रता सोडून लेकरांशी संवादाचा सेतु उभारण्याचे आव्हान आजच्या ममीपुढे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शिवाजी बेडगे,मुरलीधर बेडगे,मयुर कुलकर्णी ,सांब शास्री,देविदासराव नादरगे,प्रा.सुनील वट्टमवार,श्रीकांत हाळ्ळे ,यश शास्री,मनोहर कुलकर्णी ,रुपा बासरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा