मुख्याधिकारी राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीरात विविध उपक्रम: वृक्षारोपण, रक्तदान शिबीर संपन्न

मुख्याधिकारी राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीरात विविध उपक्रम:


वृक्षारोपण, रक्तदान शिबीर संपन्न


उदगीर : उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी शहरात विविध सामाजिक संघटनांनी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला तर पालिकेच्या टाकी परिसरात पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.


शहरातील पर्यावरणवादी असलेल्या ग्रीन आर्मी या संस्थेच्या वतीने सिंचन वसाहतीच्या परिसरात मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अजय गुजराथी, जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देविदास नादरगे, विश्वनाथ मुडपे, सुमन राठोड, ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. अनिल भिकाने, व्ही. एस. कुलकर्णी, विश्वनाथराव बिरादार, विक्रम हलकीकर, ज्ञानोबा कोटलवार, शोभा कोटलवार, वर्षा कोटलवार, रुपाली पाटील, सिद्धेश्वर पैके, अर्चना पैके, महादेव बिरादार, चंद्रकला बिरादार, सुरेखा गुजलवार, सूनन्दा सरदार, बाबासाहेब सूर्यवंशी, विवेक वाघ, चंद्रकांत उप्परबावडे आदी उपस्थित होती.


उदगीर नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 35 जणांनी रक्तदान केले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, नगरसेवक बापूराव यलमटे, मनोज पुदाले, फैय्याज शेख, फैजुखा पठाण, माजी नगरसेवक गजानन सताळकर, रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे, उद्योजक विजयकुमार पारसेवार, रोटरी क्लबचे माजी सचिव रवींद्र हसरगुंडे, यांच्यासह आर्य वैश्य समाज युवक मंडळाचे श्रीकांत पारसेवार यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांनी मुख्याधिकारी राठोड यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.


लॉयनेस क्लब उदगीरच्या वतीने मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा पब्लिक स्कुल येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड, सुमन राठोड, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया, सुनील हवा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन लॉयनेस क्लब उदगीर अध्यक्षा दिपाली औटे, महात्मा पब्लिक स्कूलच्या संचालिका संगीता नेत्रगावे पाटील, उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय समन्वयक अभिजीत औटे यांनी केले होते.या वेळी लॉयनेस क्लब उदगीर सह सचिव चंद्रकला बिरादार, सह कोषाध्यक्ष सुनीता पंडित, चंचला हुगे, वर्षाराणी धावारे, महेश धावारे, पोलिस मित्र शेख मोहम्मद, मानकोळे नारायण उपस्थित होते.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image