पाणीपुरवठा पाईपलाईन ची अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी नगरसेविका चिमेगावे यांचे उपोषण: प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे 


उदगीर: शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये अटल अमृत योजने अंतर्गत होत असलेले पाईपलाईनचे काम अर्धवट अवस्थेत असून सदरील काम पूर्ण करावे या मागणीसाठी प्रभागाच्या नगरसेविका अरुणा चिमेगावे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चिमेगावे यांनी आपले उपोषण मागे घेतले.


उदगीर शहरात मागच्या वर्षभरापासून अटल अमृत योजनेतून नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. सदरील पाईपलाईन टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामार्फत होत असून शहरात अनेक ठिकाणी हे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये अटल अमृत योजनेतून टाकण्यात येत असलेले पाईपलाईनचे काम अर्धवट राहिली असून ते त्वरित पूर्ण करावे यासाठी प्रभागातील नगरसेविका अरुणा चिमेगावे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या उपविभागीय अभियंत्यांना वेळोवेळी निवेदन देऊन विनंती केली होती, मात्र त्यांच्या पत्राची कसलीच दखल घेतली न गेल्याने चिमेगावे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. दिनांक 26 जून रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या कार्यालयासमोर अरुणा चिमेगावे यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन लाक्षणिक उपोषण सुरू केले.


या उपोषणस्थळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी आ. गोविंद केंद्रे, न. प. चे उपाध्यक्ष सुधीर भोसले, प. स. सभापती विजय पाटील, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, ऍड. दत्ताजी पाटील, गणेश गायकवाड, पप्पू गायकवाड, रामेश्वर पवार, रुपेंद्र चव्हाण, प्रा. बालाजी सूर्यवंशी, बालाजी गवारे यांच्यासह मान्यवरानी भेटी देऊन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.


उपोषण चालू असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी अरुणा चिमेगावे यांची भेट घेऊन पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image