पाणीपुरवठा पाईपलाईन ची अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी नगरसेविका चिमेगावे यांचे उपोषण: प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे 


उदगीर: शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये अटल अमृत योजने अंतर्गत होत असलेले पाईपलाईनचे काम अर्धवट अवस्थेत असून सदरील काम पूर्ण करावे या मागणीसाठी प्रभागाच्या नगरसेविका अरुणा चिमेगावे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चिमेगावे यांनी आपले उपोषण मागे घेतले.


उदगीर शहरात मागच्या वर्षभरापासून अटल अमृत योजनेतून नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. सदरील पाईपलाईन टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामार्फत होत असून शहरात अनेक ठिकाणी हे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये अटल अमृत योजनेतून टाकण्यात येत असलेले पाईपलाईनचे काम अर्धवट राहिली असून ते त्वरित पूर्ण करावे यासाठी प्रभागातील नगरसेविका अरुणा चिमेगावे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या उपविभागीय अभियंत्यांना वेळोवेळी निवेदन देऊन विनंती केली होती, मात्र त्यांच्या पत्राची कसलीच दखल घेतली न गेल्याने चिमेगावे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. दिनांक 26 जून रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या कार्यालयासमोर अरुणा चिमेगावे यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन लाक्षणिक उपोषण सुरू केले.


या उपोषणस्थळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी आ. गोविंद केंद्रे, न. प. चे उपाध्यक्ष सुधीर भोसले, प. स. सभापती विजय पाटील, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, ऍड. दत्ताजी पाटील, गणेश गायकवाड, पप्पू गायकवाड, रामेश्वर पवार, रुपेंद्र चव्हाण, प्रा. बालाजी सूर्यवंशी, बालाजी गवारे यांच्यासह मान्यवरानी भेटी देऊन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.


उपोषण चालू असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी अरुणा चिमेगावे यांची भेट घेऊन पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज