माझ्या प्रकृतीच्या बातम्या निराधार : मुख्याधिकारी भारत राठोड 

माझ्या प्रकृतीच्या बातम्या निराधार : मुख्याधिकारी भारत राठोड 


उदगीर : मागील दोन दिवसापासून शहरात काही जणांकडून माझ्या प्रकृतीबाबत समाज माध्यमामार्फत उलट-सुलट माहिती पसरविण्यात येत आहे, त्याचे खंडन करताना उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड आमच्याशी बोलताना म्हणाले की, ईश्वर कृपेने व उदगीरकर यांच्या आशीर्वादाने माझी तब्येत ठणठणीत असून मी लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. त्यामुळे समाजमाध्यमावरून येणाऱ्या उलट-सुलट बातम्या या निराधार व खोट्या माहितीच्या आधारावर आहेत. कृपया यावर विश्वास ठेवू नये.


पुढे बोलताना ते म्हणाले की मागील अडीच महिन्याच्या लॉक डाऊन च्या काळात मी सातत्याने उदगीरकर जनतेच्या सेवेत दिवस-रात्र काम केले आहे. उदगीर शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पहिल्या महिलेच्या अंत्यविधीला मी स्वतः उपस्थित राहिलो आहे. परंतु काही जणांकडून मला त्रास देण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून समाज माध्यमांचा वापर करून माझ्या प्रकृतीबद्दल चर्चा केल्या जात आहेत. उदगीर शहरातील जनतेच्या आशीर्वादाने माझी प्रकृती उत्तम असून आगामी काळात सुद्धा मी उदगीरकर जनतेच्या सेवेत कायम राहणार आहे. उदगीरकर जनतेने आपले आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी ठेवावेत, असे भावनिक आवाहनही यावेळी भारत राठोड यांनी केले आहे.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image