माझ्या प्रकृतीच्या बातम्या निराधार : मुख्याधिकारी भारत राठोड 

माझ्या प्रकृतीच्या बातम्या निराधार : मुख्याधिकारी भारत राठोड 


उदगीर : मागील दोन दिवसापासून शहरात काही जणांकडून माझ्या प्रकृतीबाबत समाज माध्यमामार्फत उलट-सुलट माहिती पसरविण्यात येत आहे, त्याचे खंडन करताना उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड आमच्याशी बोलताना म्हणाले की, ईश्वर कृपेने व उदगीरकर यांच्या आशीर्वादाने माझी तब्येत ठणठणीत असून मी लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. त्यामुळे समाजमाध्यमावरून येणाऱ्या उलट-सुलट बातम्या या निराधार व खोट्या माहितीच्या आधारावर आहेत. कृपया यावर विश्वास ठेवू नये.


पुढे बोलताना ते म्हणाले की मागील अडीच महिन्याच्या लॉक डाऊन च्या काळात मी सातत्याने उदगीरकर जनतेच्या सेवेत दिवस-रात्र काम केले आहे. उदगीर शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पहिल्या महिलेच्या अंत्यविधीला मी स्वतः उपस्थित राहिलो आहे. परंतु काही जणांकडून मला त्रास देण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून समाज माध्यमांचा वापर करून माझ्या प्रकृतीबद्दल चर्चा केल्या जात आहेत. उदगीर शहरातील जनतेच्या आशीर्वादाने माझी प्रकृती उत्तम असून आगामी काळात सुद्धा मी उदगीरकर जनतेच्या सेवेत कायम राहणार आहे. उदगीरकर जनतेने आपले आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी ठेवावेत, असे भावनिक आवाहनही यावेळी भारत राठोड यांनी केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज