हे श्रेय सर्वांचे.... औराद रक्तदात्यांचा महाराष्ट्रातील नवा विक्रम  

हे श्रेय सर्वांचे....


औराद रक्तदात्यांचा महाराष्ट्रातील नवा विक्रम


औराद शहा, : जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने औराद पंचक्रोशीत ग्रामीण भागातून, एकाच दिवशी महाराष्ट्रातील एकाच दिवसाचे सारे विक्रम मोडीत काढून, रक्तदानाच्या इतिहासामध्ये ब्लड बॅकेच्या नोंदीनुसार 503 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. ग्रामिण भागातल्या या तांड्यावस्तीवरील रक्तदान चळवळीमुळे एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. 'आम्ही रक्तदाते' अंतर्गत औराद शहाजानी, सावरी, तगरखेडा, मानेजळगाव, शेळगी या पंचक्रोशीतून उत्तम प्रतिसाद मिळाला.ब्लड बॅकेच्या उपलब्ध साधन सुविधेच्या अभावामुळे काही रक्तदात्यांना पुढच्या टप्प्यातील रक्तदानासाठी थांबवावे लागले असा अभूतपुर्व प्रतिसाद मिळाला. रक्तदानाचे महत्त्व, त्याचे फायदे तळागाळातील शेवटच्या माणसाला प्रत्यक्ष भेटून समजावून सांगण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही रक्तदाते या ग्रुपच्या वतीने उदंड प्रतिसाद लाभला. सर्वच जाती धर्मातील लोकांनी विशेषतः महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग दिला. यासाठी माऊली ब्लड बँक, भालचंद्र ब्लड बँक, सरकारी बॅंक यांनी मोलाचे सहकार्य केले. रक्तदान बुथ प्रमुख, आशाताई, अंगणवाडीताई अशा अनेकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोलाचे सहकार्य लाभले. खरे पाहता हे श्रेय सामाजिक बांधिलकी जोपासून माणुसकीसाठी काम करणाऱ्या सर्वांचेच आहे, अशी भावना या रक्तदान चळवळीतून जनतेमधे निर्माण झाली आहे...


टिप्पण्या
Popular posts
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*