हे श्रेय सर्वांचे.... औराद रक्तदात्यांचा महाराष्ट्रातील नवा विक्रम  

हे श्रेय सर्वांचे....


औराद रक्तदात्यांचा महाराष्ट्रातील नवा विक्रम


औराद शहा, : जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने औराद पंचक्रोशीत ग्रामीण भागातून, एकाच दिवशी महाराष्ट्रातील एकाच दिवसाचे सारे विक्रम मोडीत काढून, रक्तदानाच्या इतिहासामध्ये ब्लड बॅकेच्या नोंदीनुसार 503 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. ग्रामिण भागातल्या या तांड्यावस्तीवरील रक्तदान चळवळीमुळे एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. 'आम्ही रक्तदाते' अंतर्गत औराद शहाजानी, सावरी, तगरखेडा, मानेजळगाव, शेळगी या पंचक्रोशीतून उत्तम प्रतिसाद मिळाला.ब्लड बॅकेच्या उपलब्ध साधन सुविधेच्या अभावामुळे काही रक्तदात्यांना पुढच्या टप्प्यातील रक्तदानासाठी थांबवावे लागले असा अभूतपुर्व प्रतिसाद मिळाला. रक्तदानाचे महत्त्व, त्याचे फायदे तळागाळातील शेवटच्या माणसाला प्रत्यक्ष भेटून समजावून सांगण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही रक्तदाते या ग्रुपच्या वतीने उदंड प्रतिसाद लाभला. सर्वच जाती धर्मातील लोकांनी विशेषतः महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग दिला. यासाठी माऊली ब्लड बँक, भालचंद्र ब्लड बँक, सरकारी बॅंक यांनी मोलाचे सहकार्य केले. रक्तदान बुथ प्रमुख, आशाताई, अंगणवाडीताई अशा अनेकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोलाचे सहकार्य लाभले. खरे पाहता हे श्रेय सामाजिक बांधिलकी जोपासून माणुसकीसाठी काम करणाऱ्या सर्वांचेच आहे, अशी भावना या रक्तदान चळवळीतून जनतेमधे निर्माण झाली आहे...


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image