हरित उदगीर - हरित जळकोट' ची सुरुवात उदयगिरीतून - ना. संजय बनसोडे 

'


उदगीर - वृक्षारोपणाच्या माध्यमातून उदगीर विधानसभा क्षेत्रामध्ये हरितक्रांती निर्माण करायची आहे. त्याचा प्रारंभ आपण वृक्षलागवड करून उदयगिरीतून करूयात, असे मत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर हे होते. 


          यावेळी पुढे बोलताना ना. बनसोडे म्हणाले, या वर्षभरात आपल्याला 'हरित गाव' संकल्पना राबवायची आहे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 210 ग्रामपंचायतीमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाचा संकल्प केला जातो आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 'पाटोदा' गावाप्रमाणे वृक्षारोपणाच्या बाबतीत आदर्श खेडी निर्माण करायची आहेत. त्याचबरोबर वृक्ष संगोपनासाठी लागणारा खर्च शासनाच्यावतीने नागरिकांना देऊन वृक्षसंवर्धनासाठीचा 'बिहार पॅटर्न' आपण उदगीर विधानसभा क्षेत्रामध्ये राबवणार आहोत, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना नागराळकर म्हणाले, पर्यावरणाच्या बाबतीत देश व महाराष्ट्रासाठी उदगीर विधानसभा क्षेत्र आदर्श व्हावा. प्रत्येकाने आपल्या जीवनात इतरांना सावली देणारे एक तरी झाड लावावे. कुठल्याही रोगानंतर दवाखान्यात व्हेंटिलेटर जे कार्य करते तेच कार्य वृक्ष करतात. त्यामुळे ऑक्सिजन देणारे वृक्ष आहेत, हे लक्षात घेऊन वृक्ष लागवड व संगोपनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी म. ए. सोसायटीचे सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य मलिकार्जुन मानकरी, ॲड. एस .टी. पाटील, ॲड. अजय दंडवते, प्रा. आडेप्पा अंजुरे, जगदीश बागडी, डॉ. रेखा रेड्डी,नाथराव बंडे, बसवराज पाटील मलकापूरकर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर ,तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, न. प. मुख्याधिकारी भारत राठोड, विभागीय वनाधिकारी प्रियंका गंगावणे, वनअधिकारी श्री. गायकर, सहयोग बँकेचे चेअरमन रमेशआण्णा अंबरखाने , वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे ,तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सेवानिवृत्त झाल्याबद्दल प्रा बी. एन. गायकवाड ,प्रा एस .एस. पाटील यांचा आणि वृक्षारोपण कार्याबद्दल डॉ. प्रकाश येरमे, 'ग्रीन आर्मी'च्या अरुणा भिकाने , 'कारवा फाऊंडेशन'च्या आदिती पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगून वृक्षारोपणाची आवश्यकता सांगितली. संस्था सचिव प्रा. मनोहर पटवारी यांनी पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मल्लेश झुंगास्वामी यांनी तर आभार संस्था सदस्य डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी मानले.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज