चंद्रदीप नादरगे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान

चंद्रदीप नादरगे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान


उदगीर: उदगीर तालुक्यातील श्री पांडूरंग विद्यालयातील कलाशिक्षक चंद्रदीप बालाजी नादरगे यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीतर्फे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार लातूर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. 


नादरगे चंद्रदीप यांनी कोविड-19 या आपत्तीजनक परिस्थितीत वेगवेगळ्या पोस्टर्सच्या माध्यमातुन कोरोना जनजागृतीचा संदेश दिला आहे. ऑनलाइन प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मास्क स्वतः बनविणे व त्याचा वापर काळजीपूर्वक करणे. तसेच स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करणे अशा प्रकारे ग्रामीण भागातील विद्यार्थी/पालकांना कोरोना आजारासंदर्भात माहिती देऊन सामाजिक कार्य केले. याच बरोबर जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थापासून होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती विद्यार्थ्यांना दिली, जागतिक मलेरिया दिनानिमित्त स्वच्छतेची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली, ऑनलाइन उपक्रमातून विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक राख्या, ज्येष्ठा गौरी निमित्त (प्लास्टिकच्या पाना फुलांना आळा) निसर्गनिर्मित पनाफुलांची सुंदर सजावट, राष्ट्रध्वजाची व स्वातंत्र्य दिनाची कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना माहिती दिली, गंदगीमुक्त भारत या उपक्रमांतर्गत चित्रातून प्लास्टिकमुक्तीचा संदेश, नारळाच्या करवंटी, टरपलापासून गणपती बनवून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती विषयी मार्गदर्शन असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक, राष्ट्रीय, सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केली. या सेवेच्या सन्मानार्थ कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीमुळे सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून नादरगे चंद्रदीप यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, कृषि सभापती गोविंदराव चिलकुरे, समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, माजी समाजकल्याण सभापती संजयजी दोरवे, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष चंदू घोडके, सरचिटणीस वाल्मिक पंदे, कार्याध्यक्ष बापूराव चामले, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे, उदगीर अध्यक्ष मारोती लांडगे आदीची उपस्थिती होती.


कलाशिक्षक नादरगे चंद्रदीप यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे, संस्थेचे सचिव - विनायकरवजी बेंबडे, पंचायत समिती उदगीरचे माजी उपसभापती रामदास बेंबडे, मुख्याध्यापक नादरगे एस. व्ही. व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच मित्र परिवार आणि पत्रकार बांधवांनी त्याचे अभिनंदन केले.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image