अतिवृष्टीमुळे पीकाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा: राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत -राज्यमंत्री संजय बनसोडे

अतिवृष्टीमुळे पीकाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा


राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत -राज्यमंत्री संजय बनसोडे


 लातूर-मागील काही दिवसापासून सततच्या पावसाने उदगीर, जळकोट परिसरातील पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने तुर, मुग, सोयाबीन, या पीकाचा समावेश आहे या सर्व नुकसान झालेल्या पीकाचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.


 उदगीर तालुक्यातील तोगरी,मोघा, रावणगाव या सर्कल मघ्ये मागील आठवड्यात ढगफुटी सद्श्य पाऊस झाला आहे या पावसाने परिसरातील प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 1257 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे उदगीर परिसरात पावसाची सरासरी सुमारे 740 मी.मी आहे आतापर्यंत जवळपास 100टक्के पाऊस या परिसरात झाला आहे मागील काही दिवसापासून सतत पडणारा पाऊस, वातावरणातील आर्द्रता ,यामुळे सोयाबीन पीकाचे नुकसान झाले आहे या पीकास कोंब फुटत आहेत, तर मुगाची प्रतवारी घसरली आहे या पिकाचे शासन स्तरावरून पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.


Popular posts
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
उदगीरसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालयास राज्य शासनाची मंजुरी* *उदगीरकरांची महाराष्ट्रात एम.एच. - ५५ ही नवी ओळख* *क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
Image
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे : डॉ. उर्मिला चाकूरकर ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम: महिलांचा सन्मान
Image
स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा उदगीरात समारोप
Image