उदगीरात कृषी विधेयकाविरुद्ध निदर्शने

उदगीरात कृषी विधेयकाविरुद्ध निदर्शने


 


उदगीर (ता.प्र.) केंद्र सरकारने कृषी उत्पादन व्यापार व वाणिज्य(प्रोत्साहन व सुविधा) आणि शेतकरी(सक्षमीकरण व संरक्षण) किंमत हमी व कृषी सेवा करार ही दोन विधेयके संसदेत पारित करून घेतलेली आहेत. ही कृषी विधेयके शेतकरी विरोधी असून 'कायदा नको, स्वामीनाथन आयोग हवा' अश्या आशयाचे फलक हातात घेवून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर केंद्र सरकार व विधेयकाच्या विरोधात लोकभारती पक्ष व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून निषेध व्यक्त केला.


केंद्र सरकारने आणलेल्या या दोन्ही विधेयकाविरुद्ध शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिवसापासून हे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. हे आंदोलन महात्मा गांधी जयंती पर्यंत सुरू राहणार आहे. या विधेयकाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी लोकभारती पक्षाचे अजित शिंदे, माजी नगरसेवक अहमद सरवर, सोनू पिंपरे, विजय बामणीकर, बाजार समितीचे सचिव एन. डी. हंगरगे, कर्मचारी प्रदीप पाटील, दगडू माने, दिनकर कांबळे, सतीश पाटील मानकीकर, हबीब दुराणी, भगवान मांजरे सह शेतकरी, हमाल व मापारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज