अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या  जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांची मागणी 

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या 


जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांची मागणी


उदगीर (वार्ताहर )


     अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे पूर्ण मोडले असून आता कालच्या पावसाने होते नव्हते ते सर्व संपविले आहे,या अस्मानी संकटात शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली आहे.


  यावर्षी खरीप हंगामाची सुरुवात कोवीड काळात झाली.सारे जग ठप्प असताना या काळातही गप्प न राहता शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोवीडकाळाताही मशागतीची कामे करून काळ्या आईची ओटी भरली.खत बियाणे मिळविण्यासाठी टाळेबंदीच्या शेतकऱ्यांना जोखीम घेऊन खतेबियाण्यांची जुळवाजुळव करीत पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना बोगस बियाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागले.दुबार पेरणीच्या खर्चाने शेतकरी घाईकुतीला येऊनही बोगस बियाण्यांच्या संदर्भाने कोणतीही कार्यवाही शासनाने केली नाही.


यानंतर अधिकच्या पावसाने उडीद आणि मुगाचे पूर्ण नुकसान केल्याने ही पिकेही शेतकऱ्यांच्या हाती लागली नाहीत.


    मागच्या पंधरवाड्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाती येणाऱ्या सोयाबीनला ऐन भरात धोका दिला,याशिवाय तुर,ज्वारी या पिकांचे तर नुकसान केलेच पण उसाचे पिकही आडवे पाडले.उरलेसुरले सोयाबीनचे पीक काढणीची प्रक्रिया चालू असताना मंगळवारी झालेल्या पावसाने सा-या सोयाबीनची माती केली आहे.सोयाबीन काढणीसाठी लागणारी मजुरी व ताडपत्रीचे सुद्धा पैसे निघण्याची आता खात्री उरलेली नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे पूर्ण मोडले आहे.


   या नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाने मदतीचा हात देण्याची गरज असून कोणतेही निकष अथवा पंचनामे आदी घोळ न घालता शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी आग्रही मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी शासनाकडे केली आहे.


टिप्पण्या
Popular posts
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा