निटूर आणि राठोडा गावाला शेळीपालन करणार्‍या महिलांना शेळ्यांचे वाटप

 


निटूर आणि राठोडा गावाला शेळीपालन करणार्‍या महिलांना शेळ्यांचे वाटप


निलंगा :  सर्वसामान्य गोरगरिबांना सतत देण्याच्या भावनेतून शेळीपालन करण्यासाठी होतकरु महिलांना मदत म्हणून दोन्ही गावांना मिळून तब्बल दहा शेळ्यांचे वाटप करण्यात आले.ही मदत एल अँन्ड टी फायनान्सियल सर्व्हिसेस, अफार्म पुणे आणि जियामुक्ती मानव सेवा संस्था, लातूर संचलीत डिजिटल सखी प्रकल्पांतर्गत देण्यात आले आहे.


कोरोना संक्रमनातील कालावधीत या संस्थेच्या माध्यमातून अगोदर अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले होते.सर्वसामान्य माणसांची नाळ जोडण्याचे काम ही संस्था करत असल्याने सर्वसामान्य महिला आणि नागरिकांना बळ देण्याचे काम सध्या निलंगा क्लस्टरच्या माध्यमातून हा दैदिप्यमान उपक्रमाच्या सर्वसामान्य महिलांना आधार देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.निटूर आणि राठोडा गावाला तब्बल संयुक्तरित्या दहा शेळीपालन करण्याच्या माध्यमातून महिलांना आधार देण्यात आले आहे. कोरोना संक्रमनामुळे हा उपक्रम सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर करुन करण्यात आला आहे.


याप्रसंगी अध्यक्ष पवार, पञकार राजाभाऊ सोनी, अफार्मचे पशुधन अधिकारी डाॅ.राजेश कातोरे,क्लस्टर व्यवस्थापक आदिनाथ चलवाड,डिजिटल सखी स्वाती आंबेगावे, आरती जगदाळे,रोशनी साठे, संगीता डोंगरे,सारिका करंजे,मनिषा शेळके,मिना कांबळे,कृषी दूत दत्ता करंजे यांच्या उपस्थितीत शेळीपालनाचे वाटप करण्यात आले.


टिप्पण्या
Popular posts
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा