जिव्हाळा ग्रुपच्या वतीने दशरथ शिंदे यांचा सत्कार 

जिव्हाळा ग्रुपच्या वतीने दशरथ शिंदे यांचा सत्कार


उदगीर: संजीवनी विद्यालय चापोली येथे दिर्घकाळ सेवा बजावून निवृत्त झालेले येथील जिव्हाळा ग्रुपचे सदस्य प्रा. दशरथ शिंदे यांचा उदगीर येथील जिव्हाळा गृपच्या वतीने सपत्नीक करण्यात आला.


निडेबन येथील राधाकृष्णन विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, प्राचार्य बी. टी. लहाने, निडेबनचे उपसरपंच सुनील सोमवंशी, नगरसेवक राजकुमार भालेराव, जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देविदासराव नादरगे, उपाध्यक्ष विश्वनाथ बिरादार माळेवाडीकरउपस्थित होते . व्यासपीठावर सत्कारमूर्ती प्रा. दशरथ शिंदे सौ.पुष्पाताई शिंदे यांची उपस्थिती होती.


यावेळी बोलताना रामचंद्र तिरुके यांनी प्रा. दशरथ शिंदे यांनी आपल्या शिक्षकी पेशेच्या काळात अनेक विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करून अनेक पिढया घडविण्याचे काम केले आहे. आता पुढील आयुष्यात त्यांनी समस्त समाजाच्या हितासाठी काम करावे असे आवाहन केले.


अध्यक्षीय समारोपात विश्वनाथ मुडपे यांनी प्रा. दशरथ शिंदे यांनी आपल्या जगण्यातून सामाजिक ऐक्य जपल्याचे सांगत भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देवीदासराव नादरगे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक होळसंबरे यांनी केले तर आभार व्ही. एस. कुलकर्णी यांनी मानले.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज