कृषी विधेयकाला स्थगिती दिल्याबद्दल राज्य सरकारचा निलंग्यात भाजपकडून निषेध

कृषी विधेयकाला स्थगिती दिल्याबद्दल राज्य सरकारचा निलंग्यात भाजपकडून निषेध


निलंगा : केंद्र सरकारने शेतक-यांना स्वातंत्र्य देणारे तीन विधेयके संसदेत संमत केली. या विधेयकांमुळे शेतक-यांना आपला माल कोठेही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याने शेतक-यांचे जीवनमान उंचावणार आहे. परंतु महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने कृषि विधेयकाला स्थगिती देऊन शेतक-यांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ निलंगा येथे माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सूचनेवरून व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने स्थगिती आदेशाची उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर होळी करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.


या वेळी उपस्थित भाजपा तालुका अध्यक्ष शाहूराज थेट्टे, माजी सभापती अजित माने, जिल्हा परिषद सदस्य डॉ.संतोष वाघमारे, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, न. प. उपाध्यक्ष मनोज कोळे, न. प. सभापती शरद पेठकर, नगर सेवक पिंटु पाटील, मंजुळे, विष्णू ढेरे, शपीक भाई, युवा मोर्चा सरचिटणीस तानाजी बिरादार, जिल्हा संयोजक प्रमोद पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रभारी अशोक वाडीकर, सरचिटणीस आशिष पाटील, सो. मि. तालुकाध्यक्ष सुमित इन्नानी, कूमोद लोभे, प्रशांत पाटील, युवराज पवार, तम्मा माडीबोणे,उपाध्यक्ष संजय हलगरकर , रमेश कांबळे, आदी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज