आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबाचे निलंगेकरांकडून सांत्वन

आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबाचे निलंगेकरांकडून सांत्वन


 


सत्ताधा-यांना जबाबदारीचा विसर-संभाजीराव पाटील निलंगेकर


उदगीर (प्रतिनिधी)


वाढवणा(खु) व करखेली येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांत्वन केले.सत्ताधारी मंडळींना जबाबदारीचा विसर पडला असून आपत्ती आलेल्या कुटुंबांना भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.


मागील काही दिवसापूर्वी उदगीर तालुक्यातील वाढवणा बु व करखेली येथील शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या होत्या.जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी या दोन्ही कुटुंबियांची भेट घेऊन दोन्हीही कुटुंबांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.गोपीनाथराव मुंडे सहायता योजनेअंतर्गत या दोन्ही कुटुंबांना मदत देण्याचे त्यांनी सुचित केले.सत्ताधारी मंडळी सत्तेच्या खेळात गुंग असून त्यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही.आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पिडीतांना भेट देण्यासही त्यांच्याकडे वेळ नाही यावरून त्यांची असंवेदनशिलता दिसून येते अशा शब्दांत आ.संभाजीराव पाटील यांनी खंत व्यक्त केली.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे जि.प.उपाध्यक्ष सौ.भारतबाई साळुंके, दगडूसाहेब साळुंके,भगवानराव पाटील तळेगावकर,जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके,जिल्हा उपाध्यक्ष पंडित सुकणीकर, भाजपा शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर,माजी पं .स.सभापती विजय पाटील,नगरसेवक गणेश गायकवाड हे उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज