योगी सरकारकडून लोकशाहीची हत्या : कल्याण पाटील : उदगीर येथे काँग्रेस कडून निदर्शने 

योगी सरकारकडून लोकशाहीची हत्या : कल्याण पाटील


उदगीर येथे काँग्रेस कडून निदर्शने 


उदगीर : उत्तर प्रदेशातील पीडित महिलेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा उदगीर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी योगी सरकार कडून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप यावेळी केला.


उत्तर प्रदेश शाळातील हाथरस जिल्ह्यात एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या अत्याचारानंतर सदरील महिला उपचार सुरू असताना मरण पावली. या पीडित महिलेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना काँग्रेसचे राष्ट्रीय माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी , महासचिव प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रस्त्यातच अडवून धरले, शिवाय त्यांच्यासोबत धक्काबुक्कीही केली. हा प्रकार निंदाजनक असून या घटनेचा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे यावेळी कल्याण पाटील यांनी सांगितले.


काँग्रेस पक्षाच्या वतीने उदगीर येथील शिवाजी चौकात करण्यात आलेल्या निदर्शने आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजूर खान पठाण, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल कांडगिरे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास एकुर्केकर, नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती मेहबूब शेख, नगरसेवक फैजू खान पठाण, अनिल मुदाळे, पाशा बेग, माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, आदर्श पिंपरे, धनंजय मुळे, यशवंत पाटील, सतीश पाटील मानकीकर आदिंसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज