शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी


 *शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*
 
दि.12 जानेवारी 2021

उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ यांची 422 व स्वामी विवेकानंदाची 158 वी जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनायकराव जाधव यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महामानवांना विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की, बाल शिवाजीच्या मनात स्वराज्याची भावना निर्माण करून त्यांना खंबीर राष्ट्रवादाचे धडे दिले.यवनांनी मुघल आणि बहामनी काळापासून जनतेवर अन्याय अत्याचार कसे केले ,स्त्रियांची अब्रू वेशीवर टांगून बहुजन समाजाला गुलाम केल्याचा इतिहास त्यांच्या पुढे ठेवला.त्यातूनच बालशिवाजीचे संस्कार संपन्न मन घडत गेले. अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी निर्माण होत गेली.म्हणूनच त्यांनी मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे कल्याणकारी राज्य उभे केले.याचे सर्व श्रेय जिजाऊ माॅसाहेब यांच्याकडे जाते म्हणून त्या आदर्श माता व उत्तम प्रशासक ठरतात.यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना असे म्हटले की, युवकांनी त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन आदर्श बलसंपन्न भारताचे स्वप्न साकार करावे.पुढे बोलताना ते म्हणाले की,राष्ट्र आणि धर्म यांचा उन्माद द्वेष व त्यातून येणारी असहिष्णुता माणसाला पशू बनवते व ती मानवी संस्कृतीच्या विनाशाला कारणीभूत होते.म्हणून त्यांनी धर्म पंथ जात लिंग आणि राष्ट्रीयत्व या गोष्टींना नाकारून विश्व बंधुभावाची संकल्पना मांडली. यातच त्यांच्या कार्याचे मर्म अनुस्यूत झाल्याचे प्रतिपादन केले. 
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंतीचे समिती प्रमुख डॉ.सूर्यकांत सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.सुरेश शिंदे यांनी मानले. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.व्ही.डी.गायकवाड,स्टाफ सेक्रेटरी डॉ.व्ही.के.भालेराव तसेच प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज