कथाकथानाचा उपक्रम संमेलनाला ग्रामस्तरावर पोचवेल-रामचंद्र तिरूके

कथाकथानाचा उपक्रम संमेलनाला ग्रामस्तरावर पोचवेल-रामचंद्र तिरूके

उदगीर : साहित्याचा प्रवाह ग्रामीण भागापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने "९५ वे संमेलन:९५ कथाकथन "या उपक्रमातून संमेलन गावपातळीवर पोहचेल असा विश्वास संस्थेचे उपाध्यक्ष तथा मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य रामचंद्र तिरुके यांनी व्यक्त केला.वाढवणा बु.येथील जि.प.शाळेत या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.कथाकार दिगंबर कदम ,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर , मसापच्या उदगीर शाखेचे उपाध्यक्ष विवेक होळसंबरे,प्रा.डॉ .स्मिता नागोरी-लखोटिया, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकट मुंडकर, केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे , जाकीर तांबोळी, मु.अ.मजहर शेख, प्रा.रामदास केदार, रसूल पठाण, प्रभावती वडजे, निता मोरे,रेश्मा शेख,अनिता हैबतपूरे उपस्थित होते.
केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे यांनी प्रास्तविक केले.या उपक्रमाचे समन्वयक धनंजय गुडसूरकर यांनी उपक्रमाविषयी विवेचन केले. "साहित्यसंमेलन ही या परिसराला मिळालेली मोठी संधी आहे,या माध्यमातून या परिसरातील साहित्य जाणिवा विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचे तिरुके म्हणाले . यावेळी कथाकार दिगंबर कदम यांनी आपली 'पांगुळ 'ही कथा सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. व्ही.पी.गुरमे यांनी प्रास्तविक तर प्रा.रामदास केदार यांनी आभार मानले.

सहभागाचे आवाहन..
अ.भा.मराठी साहित्यसंमेलन ही आपल्या दारी आलेली अक्षरगंगा आहे.याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.जि.प.प्रा.शाळा किनी(य.),एकुर्का रोड,समर्थ विद्यालय एकुर्कारोड या शाळांतील विद्यार्थी ,शिक्षकांनी या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला.
टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा