बालिकांचा सन्मान हा भक्तीचाच मार्ग -जि.प,अध्यक्ष राहुल केंद्रे

 बालिकांचा सन्मान हा भक्तीचाच मार्ग -जि.प,अध्यक्ष राहुल केंद्रे 



उदगीर (वार्ताहर )

    "बालिका या समाजिक भूषण असून त्यांचा सन्मान करणे हा भक्तीचाच मार्ग आहे,स्रीजातीचा सन्मान ही आपली संस्कृती आहे,हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून ती दृढ करु या " असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले होनीहिप्परगा येथे अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते."हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून समाज एकत्र येतो,सामाजिक जाणिवा विकसित होतात.धार्मिक संस्कारातून मूल्यांची पेरणी होते.नव्या पिढीला ही परंपरा माहीतही होते.याबरोबरच सामाजिक दृष्टीने विचारमंथनही होणे गरजेचे आहे."स्रियांना आदर देण्याची आपली संस्कृती असून हा वारसा पुढे चालवून आपल्याला वृद्धिंगत करावयाचा आहे.आजची बालिका ही उद्याची स्री असून ती समाजाचे नेतृत्व व काळजी घेणारी आहे,यामुळे तिचा सन्मान करणे गरजेचे आहे"असे मत जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पुढे बोलताना व्यक्त केले."स्रियांनी सर्वच क्षेत्रं पादाक्रांत केली असून त्यासाठी आपला सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले.होनिप्परगा येथे आयोजित हरिनाम सप्ताह निमित्ताने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या वेळी सरपंच खंडू गायकवाड पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे नारायणराव नरवडे संजय मामा पाटील नानासाहेब माने चंदरराव पाटील शेषराओ पाटील शरद मुळे भीमराव जाधव राजू केंद्रे राम नागरगोजे सचिन नागरगोजे अनिल मारवाड़ी उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा