ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हेच मराठीचे वैभव : ह.भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर

 ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हेच मराठीचे वैभव : ह.भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर 

उदगीर: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना अनेक भाषा अवगत असताना त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी मराठी भाषेचा विचार केला हेच मराठी भाषेचे मोठे वैभव आहे, असे गौरवोद्गार ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी काढले.
उदगीर येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या सभामंडपात
मराठी राजभाषा दिनानिमित्त सोमवारी ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे माझा "मराठाची बोलू कौतुके "या विषयावर व्याख्यान झाले. या प्रसंगी त्यांनी मराठी भाषा देणे,घेणे सुखकर वाटते,हेच मराठी भाषेचे वैभव असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे होते.व्यासपीठावर संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर,रामचंद्र तिरुके,मल्लिकार्जुन मानकरी,सभापती शिवाजीराव मुळे, दिनेश सास्तुरकर,रमेश अंबरखाने,डॉ.रामप्रसाद लखोटीया, गंगाधर दापकेकर डॉ. श्रीकांत मधवरे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी केले.
पुढे बोलताना ह. भ. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी अध्यात्म्य समाजवादाची परंपरा आहे, हे सामर्थ्य उदगीरच्या विचारवंतातहोते .मराठी भाषा अन विज्ञान मराठीला दीन केले नाही.असे सांगून देगलूरकर महाराजांनी म


राठी भाषेची शुद्धता व संस्कारक्षमता जपण्याचे आवाहन केले. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मतदारसंघातील जनतेचा भौतिक विकासाबरोबरच बौद्धिक विकास होण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे म्हणाले. कार्याध्यक्ष नागराळकर यांनी देशाच्या विकासासाठी अध्यात्म साहित्य व विज्ञान यांचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात प्रतीक्षा लोहकरे या बाल साहित्यिकेचा राज्यमंत्री बनसोडे व देगलूरकर महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. डॉ.बी. आर. दहिफळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.एस. जी. अन्सारी यांनी केले.
टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा