*महाराष्ट्र महाविद्यालयात रंगली काव्यवाचन स्पर्धा*

 *महाराष्ट्र महाविद्यालयात रंगली काव्यवाचन स्पर्धा*



निलंगा : येथील महाराष्ट्र महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक, कौटुंबिक कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. कु. बेलकुंदे सुषमा या विद्यार्थिनीने ॱगुरुत्वॱ व ॱआईॱया कविता सादर करून, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आईचे योगदान काय असते याची जाणीव करून दिली. कु. टप्पेवाले सुमैय्या हिने ॱमाई सिंधुताई सपकाळॱ ॱजिंदगीॱ या कविता सादर करून अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या जीवन व कार्याचा गौरव केला. कु. जगताप सुलक्षणा यांनी माणसांच्या आयुष्याचं कोडं कधी सुटत नाही ते सोडवण्यासाठी प्रयत्नच करावे लागतात हे आपल्या ॱआयुष्याचं कोडंॱ या कवितेतून मांडले. कु. पांचाळ सपना यांनीही आपल्या आयुष्यात आई-बाबा या दोन व्यक्तींचे महत्त्व किती आहे हे गेय स्वरुपात सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर कु. प्राजक्ता पांचाळ यांनी काव्य निर्मिती कशी होते यावर भाष्य करून ॱमुलगीॱ कुटुंबात किती महत्त्वाची आहे याची जाणीव आपल्या कवितेतून करून दिली.
या बहारदार काव्य संमेलनाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. रमाकांत घाडगे यांच्या शुभहस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कोलपुके हे होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम
,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड यांचीही उपस्थिती यावेळी होती.
प्रास्ताविक डॉ. हंसराज भोसले यांनी केले, या बहारदार काव्यस्पर्धेचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. भास्कर गायकवाड यांनी केले. आभार डॉ.ज्ञानेश्वर चौधरी यांनी मानले.
टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा