साहित्यिक आपल्या घरी उपक्रम महिला सारस्वतांच्या स्वागतासाठी उदगीरच्या महिलांचा पुढाकार

 साहित्यिक आपल्या घरी उपक्रम

महिला सारस्वतांच्या स्वागतासाठी उदगीरच्या महिलांचा पुढाकार


उदगीर: उदगीर येथे 22, 23 व 24 एप्रिल रोजी होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या महिला साहित्यिक यांच्या व्यवस्थेची जबाबदारी शहरातील महिलांनी घेतली असल्याने त्यांच्या या भूमिकेचे संमेलन समितीकडून स्वागत करण्यात आले आहे.
उदगीर येथे उदयगिरी महाविद्यालयात दि. 22 ,23 व 24 एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनासाठी देशभरातुन साहित्यिक मंडळी येत आहेत. त्यांच्या व्यवस्थेसाठी संमेलन समितीकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यातच संमेलन समितीने साहित्यिक आपल्या घरी या उपक्रमाअंतर्गत शहरातील नागरिकांना शहरात येणाऱ्या साहित्यिक मंडळींची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला साद घालत शहरातील काही महिलांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर यांची भेट घेऊन आमच्या माध्यमातून कमीत कमी 50 महिला साहित्यिक भगिनींची राहण्याची सोय करू अशी ग्वाही दिली. या महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन महिला साहित्यिक यांची राहण्याची सोय करणार असल्याचे जाहीर केल्याबद्दल संमेलन कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर यांनी त्यांचे आभार मानून स्वागत केले. यावेळी महानंदा सोनटक्के, प्राचार्या डॉ. सुनीता चवळे, प्रा. मंगला विश्वनाथे, योजना चणगे,
ज्योत्स्ना समगे, ज्योती चौधरी, सरस्वती चौधरी, विद्या पांढरे, अन्नपूर्णा मुस्तादार,मंजू समगे,योजना चौधरी या महिलांनी महिला साहित्यिकांच्या निवासाची जबाबदारी स्वीकारली आहे.
Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image