साहित्यिक आपल्या घरी उपक्रम महिला सारस्वतांच्या स्वागतासाठी उदगीरच्या महिलांचा पुढाकार

 साहित्यिक आपल्या घरी उपक्रम

महिला सारस्वतांच्या स्वागतासाठी उदगीरच्या महिलांचा पुढाकार


उदगीर: उदगीर येथे 22, 23 व 24 एप्रिल रोजी होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या महिला साहित्यिक यांच्या व्यवस्थेची जबाबदारी शहरातील महिलांनी घेतली असल्याने त्यांच्या या भूमिकेचे संमेलन समितीकडून स्वागत करण्यात आले आहे.
उदगीर येथे उदयगिरी महाविद्यालयात दि. 22 ,23 व 24 एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनासाठी देशभरातुन साहित्यिक मंडळी येत आहेत. त्यांच्या व्यवस्थेसाठी संमेलन समितीकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यातच संमेलन समितीने साहित्यिक आपल्या घरी या उपक्रमाअंतर्गत शहरातील नागरिकांना शहरात येणाऱ्या साहित्यिक मंडळींची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला साद घालत शहरातील काही महिलांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर यांची भेट घेऊन आमच्या माध्यमातून कमीत कमी 50 महिला साहित्यिक भगिनींची राहण्याची सोय करू अशी ग्वाही दिली. या महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन महिला साहित्यिक यांची राहण्याची सोय करणार असल्याचे जाहीर केल्याबद्दल संमेलन कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर यांनी त्यांचे आभार मानून स्वागत केले. यावेळी महानंदा सोनटक्के, प्राचार्या डॉ. सुनीता चवळे, प्रा. मंगला विश्वनाथे, योजना चणगे,
ज्योत्स्ना समगे, ज्योती चौधरी, सरस्वती चौधरी, विद्या पांढरे, अन्नपूर्णा मुस्तादार,मंजू समगे,योजना चौधरी या महिलांनी महिला साहित्यिकांच्या निवासाची जबाबदारी स्वीकारली आहे.
टिप्पण्या
Popular posts
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा