शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन




उदगीर  : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जावी या मागणीसाठी उदगीर तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. देशात कोणीही उपाशीपोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावे, यासाठी ऊन, पाऊस, थंडी, वादळी वारा, याचा विचार न करता, न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी शेती करणे थांबविल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होईल. शेतकरी जगेल तरच जग जगेल. असे त्रिकालाबाधित सत्य असताना देखील केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने, शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केलेली नाही. म्हणून उदगीर तालुका काँग्रेसच्या वतीने उदगीर तहसीलदार यांना तालुक्यातील, राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ व्हावी, यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, महिला जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील, काँग्रेस नेत्या उषाताई कांबळे, शहराध्यक्ष मंजूर खा पठाण, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले, चंद्रप्रकाश खटके, संतोष बिरादार, दत्ता सुरनर, संतोष वळसणे, आलिम पाटील, संजय पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानोबा गोडभरले, श्रीनिवास एकुरकेकर, लक्ष्मण नारागुडे, पंडित नाना ढगे, बबन धनबा, डॉ. गोविंदराव सोनकांबळे, आशिष पाटील राजूरकर, नितीन गुंडरे, शिवराज पाटील, भगवान बच्चेवार, विपिन जाधव, विलास शिंदे, महबूब शेख, श्रीकांत पाटील, फैयाज डांगे, सोनू पिंपरे, कनिष्क शिंदे, परमेश्वर अडगुलवाड, माधव कांबळे, प्रीतम गोखले, सांगवीकर गुंडाजी, मंगेश कुमार हेरकर, राजेश्वर भाटे, बाळासाहेब जाधव इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक काँग्रेसजण उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा