राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!

राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!



उदगीर ( विक्रम हलकीकर) मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला देशाचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा उदगीर दौरा अखेर यशस्वीरीत्या पार पडला. राष्ट्रपती महोदयांच्या या दौऱ्यात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्रीही उदगीरला येऊन गेले. हा दौरा कसा होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते आणि अखेर दौरा यशस्वी झाला असल्याने हा दौरा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला एक दिशा देणारा ठरला आहे. 

        2014 साली उदगीर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा उभे राहिलेल्या ना. संजय बनसोडे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत झालेला पराभव पचवीत बनसोडे यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच मतदारसंघात संपर्क वाढविला. या काळात जनतेशी ठेवलेल्या संपर्काच्या बळावर संजय बनसोडे 2019 च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. निवडणुकीच्या नंतर झालेल्या राजकीय घडामोडीत महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित झाली. आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आमदार बनसोडे यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. मिळालेल्या या सत्तेचा ना. बनसोडे यांनी पुरेपूर वापर केला. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्र्यासोबत सलोख्याचे संबंध बाळगून असलेल्या ना. बनसोडे यांनी मंत्रालयातील अधिकारी वर्गाशीही चांगली मैत्री केली. परिणामी उदगीर मतदार संघात विकास निधीचा महापूर येण्यास सुरुवात झाली. येथील सर्व जाती धर्माच्या लोकासाठी सभागृह देत असताना शहरातील मुख्य रस्त्यावर तहसील, पंचायत समिती, प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन, पोलीस वसाहतीची इमारती उभ्या करण्यासाठी राज्य शासनाकडून करोडो रुपयांचा निधी खेचून आणला. आज सर्व इमारती दिमाखाने उभ्या झाल्या असल्याचे दिसत आहेत. 

उदगीर मतदारसंघात विकासाची गंगा चालू असताना मध्यंतरी राज्यात सत्तांतर घडले. व काही काळ राज्यमंत्री असलेले बनसोडे विरोधी पक्षात जाऊन बसले. काही काळातच पुन्हा राजकिय घडामोडी घडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपल्या काही आमदारांना सोबत घेऊन महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. या मंत्रिमंडळात ना. बनसोडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली. क्रीडा व युवक कल्याण खात्यासह बंदरे विभागासारखी महत्त्वाची खाती त्यांना मिळाली. या काळातही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबतचे मधुर संबंध उदगीरच्या विकासात फायदेशीर ठरले.बंदरे खात्याचे मंत्रिपद मिळाल्याने ना. बनसोडे यांच्या कामाचा आवाका मोठया प्रमाणात वाढला. या खात्याचा मंत्री म्हणून त्यांची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशीही चांगले संबंध प्रस्थापित झाले. या संबंधाचा फायदा ना. बनसोडे करून घेणार नाहीत ते कसे? त्यांनी प्रत्येक परिस्थितीचा योग्य फायदा घेऊन मतदारसंघात विकासाची गंगा चालू ठेवली.  उदगीर जिल्हा निर्मितीची अनेक वर्षांची मागणी आहे. ही मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी ना. बनसोडे यांनी प्रयत्न सुरू केले. आवश्यक असलेल्या शासकीय कार्यालयाच्या इमारती उभ्या करीत असताना आर टी ओ चे स्वतंत्र कार्यालय मंजूर करून घेऊन चालू केले. उदगीर सारख्या शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेऊन ते यशस्वी केले. या संमेलनाच्या माध्यमातून उदगीर शहराचे नाव देशपातळीवर नेऊन पोहोचविण्याचे काम केले. 

उदगीर शहरात गुलबर्गा येथील बुद्ध विहारच्या धर्तीवर उदगीर येथे भव्य दिव्य असे बुद्ध विहार महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ना. संजय बनसोडे यांनी उभे केले. या बुद्ध विहारच्या उद्घाटनासाठी देशाचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण दिले. ते निमंत्रण राष्ट्रपती महोदयांनी स्वीकारले. व मागच्या महिन्यात येण्यासाठी तारीख दिली होती. परंतु काही कारणास्तव तो दौरा स्थगित करण्यात आला होता.  नंतरच्या काळात राष्ट्रपती महोदयांनी 4 सप्टेंबर ही तारीख दिली व त्यानुसार त्यांचा दौरा पार पडला. उदगीर सारख्या एका ग्रामीण भागातील शहरात राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रम पूर्ण ताकदीने यशस्वी करून दाखविण्याचे काम ना. संजय बनसोडे यांनी केले. या दौऱ्यात  महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ना. बनसोडे यांच्या कार्याचे उपस्थित जनसमुदायासमोर कौतुक केले. 

राष्ट्रपती यांच्या दौऱ्यामुळे उदगीर मतदार संघात तर ना. संजय बनसोडे यांची छबी चांगलीच उजळून निघाली आहे. मात्र राज्य पातळीवर नेतृत्व करण्यासाठी एक वेगळी दिशा मिळाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

टिप्पण्या
Popular posts
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*