मराठीला अर्थार्जनाची भाषा करणे हे खरे आव्हान... धनंजय गुडसूरकर ................................... उदगीर भाषेचा होणारा ऱ्हास हा केवळ त्या भाषेचा नसून मानवी सृजनशीलतेचा असतो. भाषा वाचविण्यासाठी बोलणाऱ्याची नाहीतर त्यांच्या कृतीची आवश्‍यकता असून मराठीला व्यवहाराची व अर्थार्जनाची भाषा करणे हेच खरे आव्हान आहे असे मत भाषाभ्यासक धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केले. ते जिल्हा व सत्र न्यायालय, उदगीर आयोजित मराठी भाषा दिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्य जिल्हा न्यायाधीश अजय गुजराती यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश एन. के. मनेर, सुभेदार, न्यायाधीश गिरी, न्यायाधीश झाटे, न्यायाधीश राऊत, न्यायाधीश दिवाकर व वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुनील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना धनंजय गुडसूरकर म्हणाले की, मराठी भाषा अभिजात दर्जा पासून अजूनही वंचित आहे. भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रत्येक मराठी माणसांनी प्रयत्नशील असले पाहिजे. मातृभाषेतूनच शिक्षणाचा आग्रह आपण धरला पाहिजे. खोट्या प्रतिष्ठेसाठी परभाषेचा वापर करू नका. आपण ज्या भाषेत जन्मलो, वाढलो त्या भाषेचे आपल्यावर अनंत उपकार असून ते फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असे ते म्हणाले. आपण दररोज मराठी बोलताना अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. हे चुकीचे असून जास्तीत जास्त मराठी शब्द आपल्या भाषेत कसे वापरता येतील हा आग्रह आपण धरला पाहिजे. मराठी भाषेतील मासिके, वर्तमानपत्रे, विविध ग्रंथ प्रत्येकाने वाचली पाहिजेत. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी इतरांना पुढे न करता स्वतःपासून सुरुवात करावी असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. अध्यक्षीय समारोप करताना मुख्य जिल्हा न्यायाधीश अजय गुजराती म्हणाले की, न्यायालयीन कामकाजाची भाषाही आता मराठी झाली असून प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषा बोलली पाहिजे. तरच मराठी भाषेचे संवर्धन व भाषेची अभिवृद्धी होईल. असे मत मांडून त्यांनी मराठी भाषेच्या साहित्याची थोरवी सांगितली. कार्यक्रमाचे संचालन महेश मळगे यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वकील व भाषाप्रेमींची उपस्थिती होती.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज