राष्ट्रीय विज्ञान दिन: मराठी विज्ञान परिषदेचाही पुढाकार जिव्हाळा ग्रुपने केला बालवैज्ञानिकाचा सत्कार उदगीर: राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून मराठी विज्ञान परिषद व जिव्हाळा ग्रुपच्या वतीने बालवैज्ञानिक असलेल्या ज्ञानेश्वर दत्ता मंदाडे याचा त्याच्या शिक्षिका कल्पना चौधरी यांच्यासह सत्कार केला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती विजय पाटील होते. मंचावर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, प्रा. डॉ. राहुल आलापुरे, देवीदासराव नादरगे, श्रीकांत पाटील, अरुणा भिकाने, डॉ. अनिल भिकाने, श्री रमेश खंडोमलके, सौ. अलौकिका यांची उपस्थिती होती. यावेळी विज्ञानातील स्त्रीया या विषयावर बोलताना प्रा. डॉ. राहुल आलापुरे यांनी अनादिकालापासून विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांचे योगदान मोलाचं असतानादेखील महिलांना उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न आजपर्यंत झाला आहे. डार्विनच्या काळात व तद्नंतर च्या काळात महिला वैज्ञानिक प्रखरतेने पुढे आले असल्याचे सांगत महिला संशोधकांनी अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. कल्पना चावला सारख्या अनेक महिला संशोधकांनी विज्ञानाला वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. नोबेल पारितोषिक आजपर्यंत फक्त 20 महिलांना मिळाले आहे ही खेदाची बाब असून महिला संशोधकांसाठी शासनाकडून राष्ट्रीय पातळीवर संशोधन केंद्र उभी करण्याची गरज आहे असे मत प्रा. राहुल आलापुरे यांनी यावेळी व्यक्त केले. मुख्याधिकारी भारत राठोड यांनी समाजाचे देणे लागतो या भावनेतून जिव्हाळा ग्रुपचे कार्य चालू असल्याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल भिकाने यांनी केले, सूत्रसंचालन सुभाष तगाळे यांनी तर आभारप्रदर्शन देविदासराव नादरगे यांनी केले. यावेळी विश्वनाथ मुडपे, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर,अमृत देशपांडे, वैजनाथ पंचगलले, चंद्रकांत रोडगे, वैजनाथ साबणे, रमाकांत बनशेळकीकर, सुधाकर वायचळकर आदी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज