<no title>उदगीर. उदगीरात मा.नामदार संजयजी बनसोडे यांच्या उपस्थितीत 2000 शालेय विद्यार्थ्यांनी सामुहिक सुर्य नमस्कार सादर केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बस्वराजजी पाटील नागराळकर, प्रमुख पाहुणे मा नामदार संजयजी बनसोडे साहेब, प्रमुख उपस्थिती प्रजापति ब्रम्हकुमारी महानंदा दिदी, प्रांत प्रभारी विष्णू जी भूतडा,उप! जिल्हाधिकारी मा प्रविण जी मेंगशेट्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी जवळकर साहेब, बाळासाहेब शेलार कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा लातूर उमाकांत अंबेसंगे,प्रा बसलिंग गारठे,अतुल मांगुळकर, मिनाक्षी स्वामी सुत्रसंचालन धनराज बिरादार प्रस्ताविक नरेंद्र यंदे , मार्गदर्शन डॉक्टर संग्राम पटवारी, महानंदा बहेनजी, मा नामदार संजयजी बनसोडे, नवनियुक्त न्यायाधीश अारती अशोकराव पाटील यांचे मंत्री महोदयांनी स्वागत केले। या कार्यक्रमात सहभागी शाळा खालील प्रमाणे आहेतआहेत कमलेश्वर कन्या विद्यालय, विश्वनाथ चलवा प्रा विद्यालय, सरदार वल्लभभाई पटेल प्रा विद्यालय, सुवर्ण माता देशमुख कन्या विद्यालय, संत ज्ञानेश्वर माऊली प्रा विद्यालय, टाइम्स पब्लिक स्कूल, साईनाथ प्रा विद्यालय, कै प्रकाश कांबळे प्रा व मा आश्रम शाळा, लाल बहादुर शास्त्री मा विद्यालय, राजश्री शाहू विद्यालय, संग्राम स्मारक विद्यालय, अक्षर नंदन प्रा विद्यालय, विश्व ज्ञान निवासी ज्ञान गृह, स्वामी विवेकानंद प्रा विद्यालय, पंडित दिन दयाल उपाध्याय प्रा विद्यालय, विद्या वर्धिनी हायस्कूल, संस्कार विद्यालय या विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता या कार्यक्रमात २००० विद्यार्थी सहभागी होते। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर प्रकाश देशपांडे, धनराज बिरादार, उमाकांत अंबेसंगे, नरेंद्र यंदे,सुरेंद्र आक्कनगिरे, अतुल मांगुळकर,शिवकुमार शिरगीरे, अॅड ज्ञानोबा बेदडे, मिनाक्षी स्वामी, दत्ता कप्पीकेरे, वैभव कोटलवार, बळवंत कुलकर्णी, राम राजे, शिवलिंग मठपती, महादेव खताळ, गजानन मुक्कावार, राजेश काळे इत्यादी नी परिश्रम घेतले। या कार्यक्रमात मारवाडी यूवा मंच ने विद्यार्थ्यांना खावू वाटप केला। भास्कराचार्य अकॅडमी व सुनिल हंगरगी व पवन सायकल्स यांनी सहकार्य केले।
Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
• विक्रम हलकीकर
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
• विक्रम हलकीकर

राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
• विक्रम हलकीकर

ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
• विक्रम हलकीकर
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
• विक्रम हलकीकर
Publisher Information
Contact
nilsamachar@gmail.com
9403012041
Brahman galli udgir
About
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn