आजपासून युवक कॉंग्रेसचे रक्तदान शिबीर : इच्छुकांनी संपर्क साधावा विजय निटूरे यांचे आवाहन उदगीर : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच महाराष्ट्रात रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा युवक काँग्रेसच्या पुढाकारातून शासनाचे नियम पाळून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक रक्तदात्यांनी संपर्क साधावा असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे यांनी केले आहे. आज परिस्थितीत रक्ताचा तुटवडा उद्धभवलेला आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख , पालकमंत्री अमित देशमुख साहेब, आ. धिरज देशमुख व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काॅंग्रेसच्या वतीने आज दि. 30 मार्च 2020 पासून दि. 2 एप्रिल 2020 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबीर नागाप्प अंबरखाने ब्लड बॅंक उदगीर येथे आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक रक्तदात्यांनी संपर्क साधावा, शासनाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन न करता हे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी व सर्व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहभाग या शिबिरात अपेक्षित असल्याचे विजय निटूरे यांनी सांगितले.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज