कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निलंग्यात 121 जणांनी केले रक्तदान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा
निलंग्यात 121 जणांनी केले रक्तदान
• निलंगा : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात रक्ताचा तुटवडा मोठया प्रमाणात जाणवत असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोंपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत निलंगा शहरात 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
• युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी आरोग्य मंत्री टोंपे यांचे आवाहन गांभीर्याने घेत राम नवमी दिवशी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम सकाळी अरविंद पाटील यांनी रक्तदान केले.त्यानंतर त्यांच्या टीम मधील अनेकांसह शहरातील १२१ जणांनी यावेळी रक्तदान केले. 
• या शिबिरात रक्तदान करण्यासाठी प्रत्यक्षात ४०० जणांनी आयोजकाकडे नोंदणी केली होती.परंतु सोशियल डिस्टनसिंगची अडचण येवू नये म्हणून गुरुवारी पहिल्या टप्प्यात १२१ जणांनी रक्तदान केले. या शिबिरात पोलीस कॉ. शीतल सिंदाळकर, मरपल्ले यांनीही रक्तदान केले. अनिल अग्रवाल यांनी रक्तदात्यासाठी निलंगा राईसची सोय केली होती.
• यावेळी तहसीलदार गणेश जाधव,नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,वैद्यकिय अधिक्षक डाँ.दिलीप सौंदळे,डाँ.प्रल्हाद सोळुंके,डाँ.उध्दव जाधव, डाँ.शेषेराव शिंदे,अनिल अग्रवाल,विनोद सोनवणे,परमेश्वर शिंदे, उत्तम शेळके,अँड.गोपाळ इंगळे,शाहूराज पाटील,किशोर जाधव आदी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज