पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो खरा.............राहुल केंद्रे* पोलिसांना साथ देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांचे जनतेला भावनिक आवाहन उदगीर / लातूर प्रतिनिधी


*पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो खरा.............राहुल केंद्रे*


पोलिसांना साथ देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांचे जनतेला भावनिक आवाहन 


उदगीर / लातूर
प्रतिनिधी


जनतेच्या जीवाला जेव्हा घोर असतो, तेंव्हा त्या संकटाला रोखण्यासाठी एकच चेहरा समोर असतो. तो म्हणजे खाकी वर्दीतला पोलीस.!


पोलिस कर्मचारी आपले मित्र आहेत, अशा संकटातही जनतेसाठी ते रस्त्यावर आहेत. पोलीसांच्या सुचनाचे पालन करा, संचारबंदीत विनाकारण घराच्या बाहेर पडू नका असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी केले आहे.


समाजासाठी असो कि देशासाठी असो, पोलिसांचे बलिदान प्रत्येकांनी पाहिले आहे. आई-बहीनींची अब्रृ राखणारे पोलिस, तर कधी जनतेच्या रक्षणासाठी राबणारे पोलीस, पोलीसच न्याय व्यवस्थेची खरी डोर असतो आणि समाजाच्या भल्यासाठीच त्यांचा जोर असतो. त्यामूळे पोलिसांशी सौजन्याने वागा, त्यांची ड्युटी त्यांना करु द्या, विनाकारण तंटा वाढवू नका, आपल्या सुरक्षेसाठी आज ते घरदार सोडून, आपला परिवार सोडून रस्त्यावर आहेत. अशा भावना अध्यक्ष केंद्रे यांनी व्यक्त केलेल्या आहेत. 


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदी संदर्भात जनतेला गांभिर्य नसल्याचे चित्र काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. त्यामूळे, कूणीही संचारबंदीत पोलीस कर्मचाऱ्यांशी हूज्जत घालू नका, आपले घरदार सोडून जनतेच्या रक्षणासाठी पोलीस आज रस्त्यावर आहेत, आपल्याला रोगाची लागण होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घातला आहे. अशा पोलीसांना मदत करा, त्यांच्या आदेशाचे पालन करा, संचारबंदीचे उल्लंघन करु नका. असेही राहूल केंद्रे यांनी जनतेला आवाहन केले आहे.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image