*सामान्य रुग्णालय,उदगीर च्या दैनंदिन रुग्णसेवेचे धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज येथे स्थलांतर*

*सामान्य रुग्णालय,उदगीर च्या दैनंदिन रुग्णसेवेचे धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज येथे स्थलांतर*


 उदगीर(प्रतिनिधी):
कोवीड-19(कोरोना विषाणू संसर्ग)या आजाराच्या पार्श्वभूमीवर सामान्य रुग्णालय, उदगीर येथे संपूर्णतः डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल निर्माण करण्यात आलेले आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग,लातूर यांच्या सुचनेप्रमाणे सामान्य रुग्णालय उदगीर येथील सर्व दैनंदिन रुग्णसेवेचे स्थलांतर धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल अॅन्ड चॅरिटेबल हाॅस्पीटल,श्रीकृष्ण मंदीरासमोर,देगलुर रोड,उदगीर,जि.लातूर येथे करण्यात आले आहे. 


 तरी सर्व जनतेस कळविण्यात येते की पुढील आदेशापर्यंत उदगीर व परिसरातील सर्व नागरिकांच्या विविध आजाराची व आरोग्य विषयक समस्यांची तपासणी व आवश्यकतेनुसार उपचार-शस्रक्रिया,गरोदर स्त्रियांची प्रसंगी, प्रसुतीपश्चात उपचार-मार्गदर्शन, अपघातामुळे निर्माण होणाऱ्या आजाराचे निदान व उपचार व तसेच रक्त, व लघवी तपासण्या, सोनोग्राफी, एक्स-रे ई.सी.जी. तपासणी धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज उदगीर येथे होणार आहेत. 


रुग्णांना त्वरीत सेवा व उपचार मिळावे या करीता आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा सामान्य रुग्णालय व धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टर्स च्या माध्यमातून आणि पॅरामेडिकल, टेक्निशियन अन्य सहायकांच्या सहकार्याने रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी व तसेच यासंबंधी काही माहिती अपेक्षित असल्यास सामान्य रुग्णालय किंवा धन्वंतरी आयुर्वेद कॉलेजच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय व्ही.पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.शशिकांत एस.देशपांडे व तसेच धन्वंतरी आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डाॅ.दत्तात्रय विनायकराव पाटील यांनी केले आहे.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image