धान्याचा अपहार प्रकरणी स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द

धान्याचा अपहार प्रकरणी स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द


उदगीर: शहरातील किल्ला रोड भागातील एपीजे अब्दुल कलाम महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानदाराने औसा येथे घरातच स्व विलगीकरण करून घेतलेल्या एका कुटुंबाचे धान्य परस्पर उचल्या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मंगळवारी निलंबनाची कारवाई केली आहे.
या स्वस्त धान्य दुकानदाराचा एक लाभार्थी लोकडाऊनमुळे औसा येथे अडकून पडला आहे. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते स्वतःला घरातच विलीगीकरण करून घेतले आहेत. यामुळे त्यांनी याकाळात उदगीर येथे जावून धान्य उचलणे शक्य नसल्याने औसा येथे धान्य उचलण्यासाठी पुरवठा विभागाशी संपर्क केला.  या कुटुंबाला धान्य देण्यासाठी ऑनलाइन तपासले असता उदगीरच्या दुकानदाराने परस्पर धान्य उचलल्याचे प्रकरण पुढे आले. यामुळे या कुटुंबाने याची रीतसर तक्रार संबंधित विभागाकडे केल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार व औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या आदेशावरून या प्रकरणाची चौकशी नायब तहसीलदार राजाभाऊ खरात यांनी केल्यानंतर सदर दुकानदाराने अपहार केल्याचे तपासात पुढे आले. या प्रकरणी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी तसा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविल्यानंतर तो अहवाल ग्राहय धरून त्यांनी निलंबनाची कारवाई केली.  या प्रकरणी साथ रोग नियंत्रण कायदा व अन्न सुरक्षा कायद्यानुसार या दुकानदारावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले आहेत. शिवाय कार्डधारकांची गैरसोय टाळण्यासाठी जवळपासच्या दुकानदारांकडे पर्यायी सोय करावी असेही आदेशीत केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*