*कॅन्सरग्रस्त महिलेचा मृत्यू: अंत्यसंस्कारासाठी कोणीही येईना: माणूसकिच्या भावनेतून मुख्याधिकारी राठोड अंत्यसंस्कारासाठी पुढे सरसावले*

*कॅन्सरग्रस्त महिलेचा मृत्यू: अंत्यसंस्कारासाठी कोणीही येईना: माणूसकिच्या भावनेतून मुख्याधिकारी राठोड अंत्यसंस्कारासाठी पुढे सरसावले*
उदगीर : शहरातील एका कॅन्सरग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे माहिती मिळताच संवेदनशील मनाचे असलेले मुख्याधिकारी भारत राठोड हे स्वतः पुढे येऊन या महिलेवरील अंत्यसंस्काराचे सर्व सोपस्कार पार पाडले.
उदगीर येथील प्रभाग क्रमांक 7 मधील एक महिला अनेक वर्षांपासून कॅन्सरने ग्रस्त होती. शुक्रवारी रात्री तिचा मृत्यु झाला . तिच्या पश्चात घरात एक मुलगा आहे. कोरोनाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. सदरील घटनेची माहिती प्रभागातील कार्यकर्ते अमोल अनकल्ले यांनी मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या कानावर घातली. 
सदरील घटनेची माहीती मिळताच मनाने संवेदनशील असलेल्या मुख्याधिकारी राठोड यांनी आपले कर्तव्य तर आहेच पण माणुसकीच्या भावनेतून या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतः घटनास्थळी आपल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दाखल झाले. सदरील महिलेच्या प्रेताचे मेडिकल चेकअप करून अंबुलन्सची सोय केली. व सदरील महिलेवर अंत्यसंस्काराचे सोपस्कार पूर्ण केले. यावेळी नगरसेवक मनोज पुदाले, दिलीप अनकल्ले यांची उपस्थिती होती.
यापूर्वी कोरोना ग्रस्त महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील मुख्याधिकारी राठोड यांनी पुढाकार घेतला होता. त्या प्रसंगातील अनुभव त्यांनी व्यक्त केले आहेत. मुख्याधिकारी राठोड यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*