तरूणाईने सावरकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा - प्रा. स्नेहल पाठक 


तरूणाईने सावरकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा - प्रा. स्नेहल पाठक वन रोमहर्षक व दीपस्तंभासारखे असून तरुणाईसाठी ते प्रेरणास्त्रोत आहे. त्यामुळे सावरकरांचे चरित्र व त्यांनी निर्माण केलेले साहित्य तरुणाईने आवर्जून वाचावे. देशभक्तीचे जाज्वल्य रूप म्हणजे सावरकर ! प्रचंड वाचन, ध्येयनिष्ठा, राष्ट्रभक्ती, भाषाभ्यास, कर्तव्यनिष्ठता, राष्ट्राभिमान यांच मिश्रण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होत, असे मत स्नेहल पाठक यांनी संस्कार भारती शाखा उदगीर च्या वतीने सावरकर जयंतीनिमित्त आयोजित 'सावरकर : एक समर्पित जीवन' या कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने व्यक्त केले.


पुढे बोलताना प्रा. पाठक म्हणाल्या, संकल्प, बलिदान, संघर्ष, असह्य वेदना, सश्रम कारावास, काळ्यापाण्याची शिक्षा यावरती मात करत देशाप्रतीचा समर्पण भाव व त्यांनी निर्माण केलेली साहित्य कृती तरुणाईने आजच्या प्रतिकूल परिस्थितीत लक्षात घ्यावी. राष्ट्रीय स्वातंत्र्य व त्यानंतर सामाजिक सुधारणा याबाबतचे सावरकरांचे योगदान अलौकिक आहे. त्यामुळे सावरकरांचा तरुणाईने आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. या ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात संस्कार भारती देवगिरी प्रांत, अंबाजोगाई, तुळजापूर, उस्मानाबाद, नांदेड, माजलगाव येथील संस्कार भारतीचे पदाधिकारी सहभागी होते. याप्रसंगी संस्कार भारतीचे ध्येयगीत डॉ. अर्चना पाटील यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची रचना प्रा. डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष सौ. संध्या पत्तेवार, श्री. प्रदिप पत्तेवार, सौ. अंबिका जेवळीकर, रिषभ पत्तेवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सौ. प्रीती दुरुगकर यांनी तर आभार संरक्षक डॉ. दिपाली कुलकर्णी यांनी मानले.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image