तरूणाईने सावरकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा - प्रा. स्नेहल पाठक 


तरूणाईने सावरकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा - प्रा. स्नेहल पाठक वन रोमहर्षक व दीपस्तंभासारखे असून तरुणाईसाठी ते प्रेरणास्त्रोत आहे. त्यामुळे सावरकरांचे चरित्र व त्यांनी निर्माण केलेले साहित्य तरुणाईने आवर्जून वाचावे. देशभक्तीचे जाज्वल्य रूप म्हणजे सावरकर ! प्रचंड वाचन, ध्येयनिष्ठा, राष्ट्रभक्ती, भाषाभ्यास, कर्तव्यनिष्ठता, राष्ट्राभिमान यांच मिश्रण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होत, असे मत स्नेहल पाठक यांनी संस्कार भारती शाखा उदगीर च्या वतीने सावरकर जयंतीनिमित्त आयोजित 'सावरकर : एक समर्पित जीवन' या कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने व्यक्त केले.


पुढे बोलताना प्रा. पाठक म्हणाल्या, संकल्प, बलिदान, संघर्ष, असह्य वेदना, सश्रम कारावास, काळ्यापाण्याची शिक्षा यावरती मात करत देशाप्रतीचा समर्पण भाव व त्यांनी निर्माण केलेली साहित्य कृती तरुणाईने आजच्या प्रतिकूल परिस्थितीत लक्षात घ्यावी. राष्ट्रीय स्वातंत्र्य व त्यानंतर सामाजिक सुधारणा याबाबतचे सावरकरांचे योगदान अलौकिक आहे. त्यामुळे सावरकरांचा तरुणाईने आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. या ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात संस्कार भारती देवगिरी प्रांत, अंबाजोगाई, तुळजापूर, उस्मानाबाद, नांदेड, माजलगाव येथील संस्कार भारतीचे पदाधिकारी सहभागी होते. याप्रसंगी संस्कार भारतीचे ध्येयगीत डॉ. अर्चना पाटील यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची रचना प्रा. डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष सौ. संध्या पत्तेवार, श्री. प्रदिप पत्तेवार, सौ. अंबिका जेवळीकर, रिषभ पत्तेवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सौ. प्रीती दुरुगकर यांनी तर आभार संरक्षक डॉ. दिपाली कुलकर्णी यांनी मानले.


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*