उदयगिरित लोकप्रशासन विभागाच्यावतीने राष्ट्रीय वेबिनार संपन्न

उदयगिरित लोकप्रशासन विभागाच्यावतीने राष्ट्रीय वेबिनार संपन्न


उदगीर :(दिनांक 31 मे )येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्यावतीने ऑनलाइन पद्धतीने 'कोरोनाचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासनावर होणारा परिणाम' या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर व सचिव प्रा. मनोहरराव पटवारी यांनी शुभेच्छा संदेश देऊन केले. राष्ट्रीय वेबिनारसाठी साधन व्यक्ती म्हणून कामता प्रसाद सुंदरलाल साकेत महाविद्यालय, आयोध्या, उत्तर प्रदेश येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमुद रंजन व मगध विश्वविद्यालय, बोधगया, बिहार येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. शैलेंद्र कुमार सिंग हे होते.


          यावेळी बोलताना डॉ. कुमुद रंजन यांनी कोरोनाविरुद्ध सक्षमपणे सामना करणाऱ्या डब्ल्यू. एच. ओ., डब्ल्यू.टी.ओ., जी-20, सार्क यासारख्या आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना विषयी सविस्तर माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन, अमेरिका, इटली, रशिया, जपान, भारत येथील प्रशासकीय व्यवस्थांचा त्यांनी आढावा घेतला. कोरोनामुळे भारतीय प्रशासकीय व्यवस्था प्रभावित झाली असली तरी जागतिक स्तरावर भारतासाठी ही एक चांगली संधी आहे,अशा प्रकारचा आशावाद व्यक्त केला. डॉ. शैलेंद्र सिंग यांनी भारतीय प्रशासकीय व्यवस्थेच्या 'स्टील फ्रेम' विषयी भाष्य केले. डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, प्रशासकीय सर्व अधिकारी व कर्मचारी यामुळेच कोरोनासारख्या महामारीचा भारत सक्षमपणे मुकाबला करत आहे. आपत्ती वारंवार येत असते परंतु आलेल्या आपत्तीतून आपण काही गोष्टी शिकण्याची आवश्यकता आहे. भारतीय प्रशासन व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक करावा, असे आवाहन याप्रसंगी बोलताना केले.


       कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा. डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी तर आभार लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. गौरव जेवळीकर यांनी केले. दयानंद स्वामी यांनी तांत्रिक सहकार्य केले. या राष्ट्रीय वेबिनारमध्ये 598 प्राध्यापक संशोधक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image