डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान

डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान


उदगीर (विक्रम हलकीकर) : पैसे कमविणे हा उद्देश ठवून वैद्यकीय व्यवसाय करणारी मंडळी मोठया प्रमाणात पहायला मिळतात. पण हा व्यवसाय नाही तर सेवा आहे या भावनेतून काम करणारी मंडळी देखील अनुभवास येतात. अशाच पद्धतीने सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉक्टर म्हणून अनुप चिकमुर्गे यांचे नाव घ्यावे लागेल. अमृत हॉस्पिटलच्या माध्यमातून लॉकडाऊन च्या काळात डॉ चिकमुर्गे दाम्पत्याने उदगीरकरांना दिलेली सेवा पाहता हे हॉस्पिटल उदगीरकरासाठी वरदानच ठरले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


डॉ. अनुप चिकमुर्गे व त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया बाबुराव विभूते (चिकमुर्गे) या दोघांचेही मूळ गाव उदगीर. दोघांनीही प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उदगीर येथेच पूर्ण केले.त्यांनतर डॉ. अनुप चिकमुर्गे यांनी एम. बी. बी. एस. चे शिक्षण मुंबई येथे नायर हॉस्पिटलमध्ये तर त्यापुढील एम. डी. चे शिक्षण जॉन कॉलेज बेंगलोर येथे पूर्ण केले. तर डॉ. सुप्रिया यांनी एम.बी.बी.एस. व एम .डी. या दोन्ही पदव्या सायन हॉस्पिटल मुंबई येथून संपादन केल्या आहेत. 


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई व लातूर अशा ठिकाणी काही वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या मातृभूमितील गरजू लोकांना करून घ्यावा या प्रांजळ हेतूने चिकमुर्गे दाम्पत्याने उदगीर येथे हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि सप्टेंबर 2019 मध्ये अमृत हॉस्पिटल या नावाने आपले हॉस्पिटल सुरू केले. मूळ गाव उदगीर हेच असल्याने त्यांना स्थानिक सामाजिक व आर्थिक परिस्थितीची चांगली जाणीव आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या रुग्णालयात आलेल्या रुग्णांचे अगोदर मानसिक दृष्ट्या समाधान करणे व त्यावर योग्य उपचार करण्याचे काम अमृत हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू झाले. दरम्यानच्या काळात सर्वत्र कोरोनाच्या चांगलाच कहर माजविला, तसाच कहर उदगीर शहर व तालुक्यात देखील माजला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दवाखाने काही दिवस बंद राहिले. तर काही डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने सेवा देण्यास सुरुवात केली. काही डॉक्टर कोरोनाच्या भीतीने रुग्णाला दोन तीन मीटरच्या लांबीवरून तपासू लागले. मात्र या काळात कोणत्याही आजाराचा रुग्ण आल्यास आपल्या जीवाची बाजी लावत डॉ. अनुप चिकमुर्गे यांनी प्रत्येक रुग्णाला जवळून तपासत त्याला काय त्रास होत आहे याची माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करीत त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे त्यांच्या अर्धांगिनी डॉ. सौ. सुप्रिया चिकमुर्गे या शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये मध्ये अतिशय धडाडीने सेवा देताना दिसल्या. 


कोरोनाच्या काळात उदगीरच्या अनेक रुग्णांना अमृत हॉस्पिटल म्हणजे एक समाधान करणारे मंदिरच वाटत होते. नावाप्रमाणेच या हॉस्पिटलमधून उपचार रूपी अमृत रुग्णांना मिळाल्याने कण्हत आलेला रुग्ण परत जाताना हसत जात आहे. डॉ. चिकमुर्गे दाम्पत्यांना खऱ्या अर्थाने कोविड योद्धा समाजाने गौरव केला पाहिजे.


रुग्णांची आर्थिक परिस्थिती ओळखून त्या रुग्णांना सेवाभावी वृत्तीने देण्याचे काम केल्यामुळे रुग्ण न नातेवाईकांकडून डॉक्टरांबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात आहे. 


टिप्पण्या
Popular posts
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज