डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान

डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान


उदगीर (विक्रम हलकीकर) : पैसे कमविणे हा उद्देश ठवून वैद्यकीय व्यवसाय करणारी मंडळी मोठया प्रमाणात पहायला मिळतात. पण हा व्यवसाय नाही तर सेवा आहे या भावनेतून काम करणारी मंडळी देखील अनुभवास येतात. अशाच पद्धतीने सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉक्टर म्हणून अनुप चिकमुर्गे यांचे नाव घ्यावे लागेल. अमृत हॉस्पिटलच्या माध्यमातून लॉकडाऊन च्या काळात डॉ चिकमुर्गे दाम्पत्याने उदगीरकरांना दिलेली सेवा पाहता हे हॉस्पिटल उदगीरकरासाठी वरदानच ठरले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


डॉ. अनुप चिकमुर्गे व त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया बाबुराव विभूते (चिकमुर्गे) या दोघांचेही मूळ गाव उदगीर. दोघांनीही प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उदगीर येथेच पूर्ण केले.त्यांनतर डॉ. अनुप चिकमुर्गे यांनी एम. बी. बी. एस. चे शिक्षण मुंबई येथे नायर हॉस्पिटलमध्ये तर त्यापुढील एम. डी. चे शिक्षण जॉन कॉलेज बेंगलोर येथे पूर्ण केले. तर डॉ. सुप्रिया यांनी एम.बी.बी.एस. व एम .डी. या दोन्ही पदव्या सायन हॉस्पिटल मुंबई येथून संपादन केल्या आहेत. 


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई व लातूर अशा ठिकाणी काही वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या मातृभूमितील गरजू लोकांना करून घ्यावा या प्रांजळ हेतूने चिकमुर्गे दाम्पत्याने उदगीर येथे हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि सप्टेंबर 2019 मध्ये अमृत हॉस्पिटल या नावाने आपले हॉस्पिटल सुरू केले. मूळ गाव उदगीर हेच असल्याने त्यांना स्थानिक सामाजिक व आर्थिक परिस्थितीची चांगली जाणीव आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या रुग्णालयात आलेल्या रुग्णांचे अगोदर मानसिक दृष्ट्या समाधान करणे व त्यावर योग्य उपचार करण्याचे काम अमृत हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू झाले. दरम्यानच्या काळात सर्वत्र कोरोनाच्या चांगलाच कहर माजविला, तसाच कहर उदगीर शहर व तालुक्यात देखील माजला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दवाखाने काही दिवस बंद राहिले. तर काही डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने सेवा देण्यास सुरुवात केली. काही डॉक्टर कोरोनाच्या भीतीने रुग्णाला दोन तीन मीटरच्या लांबीवरून तपासू लागले. मात्र या काळात कोणत्याही आजाराचा रुग्ण आल्यास आपल्या जीवाची बाजी लावत डॉ. अनुप चिकमुर्गे यांनी प्रत्येक रुग्णाला जवळून तपासत त्याला काय त्रास होत आहे याची माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करीत त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे त्यांच्या अर्धांगिनी डॉ. सौ. सुप्रिया चिकमुर्गे या शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये मध्ये अतिशय धडाडीने सेवा देताना दिसल्या. 


कोरोनाच्या काळात उदगीरच्या अनेक रुग्णांना अमृत हॉस्पिटल म्हणजे एक समाधान करणारे मंदिरच वाटत होते. नावाप्रमाणेच या हॉस्पिटलमधून उपचार रूपी अमृत रुग्णांना मिळाल्याने कण्हत आलेला रुग्ण परत जाताना हसत जात आहे. डॉ. चिकमुर्गे दाम्पत्यांना खऱ्या अर्थाने कोविड योद्धा समाजाने गौरव केला पाहिजे.


रुग्णांची आर्थिक परिस्थिती ओळखून त्या रुग्णांना सेवाभावी वृत्तीने देण्याचे काम केल्यामुळे रुग्ण न नातेवाईकांकडून डॉक्टरांबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात आहे. 


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image