लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

लातुरचे मतदार 'लाडक्या  बहिणी'च्या पाठीशी 


डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद 




    लातूर/प्रतिनिधी: भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ गंजगोलाईतून काढण्यात आलेल्या पदयात्रेला शहरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.विविध समाजघटकातील नागरिक,व्यापारी,महिला व  युवक-युवतींनी या यात्रेत सहभाग नोंदवला. यामुळे लातूर शहर मतदारसंघातील मतदार व नागरिक आपल्या लाडक्या बहिणीच्या अर्थात डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पाठीशी मोठ्या संख्येने उभे असल्याचे चित्र दिसून आले.

    डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी दीपावलीचे औचित्य साधत गंजगोलाईतील श्री जगदंबा मातेची आरती करून पदयात्रा काढली. छत्रपती शिवाजी महाराज रोड,सराफ लाईन,गुळ मार्केट,कामदार रोड, हनुमान चौक,सुभाष चौक,मस्जिद रोड या मार्गे निघालेल्या या पदयात्रेचा पुन्हा गंजगोलाईत समारोप झाला.

     पदयात्रेदरम्यान उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यापारी बांधवांशी संवाद साधला.त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही केली. गंजगोलाई हे लातूरचे हृदय मानले जाते.या परिसरात व्यापार केंद्र असून शहरातील नागरिक खरेदीसाठी या भागात येतात.शहराच्या प्रत्येक भागातील नागरिक आणि व्यापारी येथे भेटतात.डॉ.

अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी या मंडळींशी संवाद साधला. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

    पदयात्रेदरम्यान खरेदीसाठी गंजगोलाई परिसरात आलेल्या नागरिक,महिला व युवक- युवतींशीही अर्चनाताई बोलल्या.सामान्य नागरिकांना थांबून बोलणाऱ्या अर्चनाताईंचे नागरिकांनीही कौतुक केले.

    लातूरची बाजारपेठ राज्यात प्रसिद्ध असून येथील गंजगोलाईची अनोखी रचना इतरत्र कुठेही आढळत नाही. त्याच पद्धतीने लातूरकर माणसाचं मन असून लातूरसारखी माणसं  राज्यात कुठेही भेटत नाहीत,असे डॉ. अर्चनाताई यावेळी बोलताना म्हणाल्या.नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रश्न समजून घेतले.शह

टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*