आज उदगीरच्या 20 व्यक्तीची स्वॅब तपासणी 19 निगेटीव्ह एकाचा अहवाल पॉझिटिव्ह

आज उदगीरच्या 20 व्यक्तीची स्वॅब तपासणी


19 निगेटीव्ह एकाचा अहवाल पॉझिटिव्ह


 लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 23.05.2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 20 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


आज एकुण 175 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 43 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 2 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 1 व्यक्तींचा अहवाल (Inconclusive) आला आहे. त्यापैकी एक रुग्ण अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील असून त्याची प्रकृती या रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच गंभीर होती. रुग्णालयात दाखल होताना रक्तदाब कमी होता व त्यांना मागील दोन वर्षांपासून फुफ्फुसाचा आजार Intertitial lung disease होता व तो त्यावर उपचार घेत होता. सद्यस्थितीत त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. व दुसरा रुग्ण लातूर येथील 6 वर्षाची मुलगी असून तिला ताप व निमोनिया असून तिची प्रकृती स्थिर आहे व ती उपचाराला प्रतिसाद देत आहे.


जळकोट येथुन 2 व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रेणापूर येथील 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आहेत.मुरुड येथील 7 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 7 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कासारशिरसी येथील 2 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे लातुर जिल्हयातील एकुण 91 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 84 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.


तसेच बीड जिल्हयातील 43 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 39 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 03 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तींचा अहवाल Inconclusive आला आहे. उस्मानाबाद जिल्हयातील 41 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 34 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 4 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत आहेत व एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे.


असे एकुण आज 175 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 157 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 8 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Reject करण्यात आला आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.


  


     


         


 


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image