सोयाबीन बियाणे उगवण झाली नसल्याने संबंधित सोयाबीन उत्पादक कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा: कृषी विभागाकडे प्रा.विवेक सुकने यांची मागणी

सोयाबीन बियाणे उगवण झाली नसल्याने संबंधित सोयाबीन उत्पादक कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा: कृषी विभागाकडे प्रा.विवेक सुकने यांची मागणी


*शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून देण्याचीही मागणी*


उदगीर: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कृषी दुकानदारांकडून चांगल्या,नामांकित कंपनीची सोयाबीन बियाणे खरेदी करून शेतात सोयाबीनची पेरणी केली होती,परंतु पेरणीला आठ दिवस उलटून गेल्यावर ही सोयाबीन बियाणाची उगवण झालीच नाही,यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे,अगोदरच मोठ्या संकटाना सामोरे जात शेतकऱ्यांनी पेरणी केली याबाबत बियाणे न उगवण्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी कृषी विभागाकडे केल्या असून यामध्ये अनेक सोयाबीनच्या कंपन्याचे बियाणे डबल लेबल सर्टिफाइड असूनही शेतकऱ्यांनी पेरलेली बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागत आहे, शेतकऱ्यांना बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित सोयाबीन उत्पादक कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणी करता सोयाबीनचे दर्जेदार बियाणे कृषी विभागाने त्वरित उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी लातूर चे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश सचिव प्रा.विवेक सुकने यांनी केली आहे.


खरीप हंगामामध्ये मृगनक्षत्रचा पुरेसा व समाधानकारक पाऊस पडला असल्यामुळे शेतकऱ्यांनी धावपळ करत सोयाबीनची पेरणी केली होती, परंतु पेरणी होऊनही सहा-सात दिवस झाल्यानंतर हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीनचे बियाणे उगवतच नसल्यानं याबाबत शेतकऱ्यांनी दुकानदाराकडे धाव घेत या बाबत विचारणा करीत आहेत, दुकानदारांची सोयाबीन बियाणे खरेदीची पावती असतानाही दुकानदार हात वर करून हा सर्व प्रकार संबंधित कंपनीवर ढकलत आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारीचा मार्ग अवलंबला आहे,परंतु कृषी विभाग देखील प्रत्येक शेतकऱ्यांना शेतावर जाऊन पंचनामा करण्यास वेळ लावत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी विभागाला प्राप्त तक्रारीची शहानिशा करण्यासाठी कृषी विभागाने जास्तीत जास्त पथकाची स्थापना करून नुकसान झालेल्या शेताची पाहणी करून पंचनामा करावा व नुकसानीचा अवहाल तयार करून संबधित कंपनीकडून शेतकऱ्यांना पेरणी करता सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून द्यावे व दिलासा द्यावा.पहिल्याच पेरणीकरता बियानाची शेतकऱ्यांकडे सोय नसताना आता दुबार पेरणी करण्याची शेतकऱ्यांना वेळ आली आहे. शेतकऱ्यांची बोगस,दर्जाहीन, न उगवणारे बियाणे देऊन फसवणूक करणाऱ्या सर्वच संबंधित सोयाबीन उत्पादक कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणीही प्रा.विवेक सुकने यांनी केली आहे.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image