55 वय वर्षे पेक्षा अधिकच्या व्यक्तींची  पल्स ऑक्सीमिटरने तपासणी करावी: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत 

55 वय वर्षे पेक्षा अधिकच्या व्यक्तींची 


पल्स ऑक्सीमिटरने तपासणी करावी: जिल्हाधिकारी जी. श्रीकांत 


 


लातूर:- जिल्हयातील 55 वयोवर्षे पेक्षा अधिकच्या प्रत्येक व्यक्तींची आरोग्य विभागाने पल्स ऑक्सीमिटरने तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोरोना संबंधित सनियंत्रण समिती आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीस मनपा आयुक्त देविदास टेकाळे ,अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे उपस्थित होते.


या बैठकीस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांचा प्रार्दुभाव वाढत आहे. प्रत्येक विभागाने आपणास नेमून दिलेली कामे नियोजन पूर्व करावेत. कंटेनमेंट झोन मधील झेानल ऑफिसरने शासनाच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे आपले कर्तव्य बजावणे नितांत गरजेचे आहे.जिल्हयातील 55 वर्षावरील प्रत्येक व्यक्तींची आरोग्य विभागाने पल्स ऑक्सीमिटरने तपासणी करावी अशा स्पष्ट सुचना या वेळी दिल्या. 


प्रत्येक विभागातील नोडल अधिकाऱ्याने बाधित क्षेत्रातील संबंधितांकडून गृह विलगीकरणाबाबतचे संमती पत्र घेऊन गृह विलगीकरण करावे. व त्या घरास स्टीकर लावण्यात यावे असे सूचित केले.कोरोना सनियंत्रण समितीच्या सदस्याने जिल्हयात उभारण्यात आलेल्या कोवीड सेंटरला भेट देऊन नियंत्रण ठेवावे. अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिल्या.


या बैठकीस जिल्हा कोरोना सनियंत्रण समितीचे सदस्य ,आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


 


टिप्पण्या
Popular posts
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा